शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खाऊचे पैसे दुष्काळग्रस्तांसाठी

By admin | Updated: October 8, 2015 00:33 IST

अभिनव उपक्रम : कुणकेरी शाळेतील विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

सावंतवाडी : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नं. १ मधील ४३ मुलांनी आपल्या घरातील बचत बँक म्हणजेच आपल्या खाऊच्या पैशातून ११ हजार ५०० रूपये देणगी स्वरूपात मदत प्रभारी तहसीलदार भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द केली.‘आमचा महाराष्ट्र आमचा शेतकरी’ हा संवेदनशीलता मूल्यावर आधारीत शैक्षणिक उपक्रम जिल्हा परिषद शाळा नं. १ कुणकेरीमध्ये घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, गटशिक्षणाधिकारी शिवाजी देसाई, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, सरपंच मनाली परब, उपसरपंच कृष्णा मेस्त्री, गणेश परब, राजन सावंत, तलाठी, वन अधिकारी, पालकवर्ग बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी सावंत, स्वागत पूजा सावंत, प्रस्ताविक गीता बरागडे, उपक्रमसूची सानिका सावंत आणि सिद्धी परब या छोट्या मुलांनी करून मान्यवरांकडून शाबासकी मिळविली. शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त विठ्ठल कदम, अध्यापक रश्मी वाडकर, बाबली चिळे, लीना सावंत, अस्मीता कादार या सर्वांच्या कल्पकतेतून व सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला. (वार्ताहर)प्रमोद सावंत : राज्यात आदर्श ठरेलयावेळी सभापती प्रमोद सावंत म्हणाले की, आपल्या शाळेचा आपणास अभिमान वाटतो आहे. पालकांनी हे कार्य असेच पुढे न्यावे, ज्यामुळे आपल्या गावाचा मोठा नावलौकीक होईल. प्रभारी तहसीलदार जाधव म्हणाले, शाळेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना देणे म्हणजेच या शाळेच्या विचारी व संस्कारी शिक्षणाची शिदोरी निदर्शित करणारी आहे. महाराष्ट्रातील हा यंदाचा पहिलाच उपक्रम असून राज्यात हा उपक्र म आदर्श निर्माण करेल, असे मत मांडले.