शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

बागायतदारांकडून निर्वाणीच्या उपायांवर भर

By admin | Updated: July 10, 2014 00:11 IST

तुुडतुड्यांच्या हल्ल्याने हतबलता : पावसाच्या ओढीची प्रतीक्षा

नरेंद्र बोडस - देवगडनिसर्गचक्रच बदलल्यामुळे कधी नव्हे एवढी बागायतदारांची हतबलता पुढे आली आहे. तुडतुड्याच्या प्रचंड हल्ल्यामुळे काही प्रमाणात फवारण्या केल्याशिवाय हा हल्ला परतवून लावणे अशक्य होणार आहे. परंतु फवारणीपूर्वी व नंतर किमान एक ते दोन दिवस पावसाने ओढ दिल्याशिवाय फवारणीचा परिणाम होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असल्याने अशाप्रकारची संधी बागायतदारांना मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच कोवळी पालवी त्यांच्या भक्ष्यस्थानी पडून झाडे पुन्हा पालवण्याची प्रक्रिया कालांतराने सुरु होईल व म्हणूनच आंबा हंगाम पुढे जाईल अशी भीती बागायतदारांना वाटत आहे. पावसाने जोर धरला तरी किटकनाशक फवारणी न करता संजीवके वापरण्याचा कालावधी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्याअखेर लांबवता येत नाही. पालवी नष्ट झाल्याने संजीवकाचा तसाच वापर करणे किंवा पावसाअभावी खतांचा डोस यापूर्वी न देता आल्याने तो आता देऊन मग संजीवकाचा डोस लांबवणेही आंबा बागायतदारांना स्वतंत्रपणे वेळापत्रक आखून करता येणे शक्य होत नाही. किटकनाशक फवारणीसाठी काळ अनुकूल असल्यास सायपर मेश्रीन, इमिडा यांची फवारणी आंबा कलमांवर करावी लागेल. त्याबरोबर डी डी इ पी (डायक्लोरोव्हास)ची फवारणीही करणे उपयुक्त ठरेल, असे जाणकार आंबा बागायतदार सुनिल कुलकर्णी यांचे हे मत आहे.देवगड तालुक्यात सध्या कुणकेश्वर, मिठमुंबरी, तारामुंबरी आदी भागात पालवीची फूट अद्याप पुरेशी नाही तर विजयदुर्ग पट्ट्यात कलमे उत्तमप्रकारे पालवल्याचे चित्र आहे. याठिकाणी नवीन पालवीची जपणूक होणे गरजेचे आहे. फवारणी करणे जरुरीचे ठरत असल्याने आंबा बागायतदारांनी खताचे डोस देणे पावसाच्या ओढीमुळे लांबवले आहे. आता पाऊस सुरु झाल्याने खतांचे डोस देणे बागायतदार या आठवड्यात उरकून घेतील. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या फरकाने संजीवकाचा डोस देणे सुरु करता येईल. मात्र, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर संजीवकाचा डोस देणे अजिबात फायदेशीर ठरणार नाही याचीही जाणीव बागायतदारांना आहे. निसर्गचक्राच्या फेऱ्यात आंबा बागायतदार यंदा सापडला आहे. अगतिकता व हतबलता यांची दाहक जाणीव करून देणारे असेच हे वातावरण आहे. जर-तर च्या चक्रात सापडून चुकीचे निर्णय व उत्पादन खर्चातील वाढीला आमंत्रण देणे यानंतरच्या कठीण काळात आंबा बागायतदाराला मुळीच परवडणारे नाही. कारण स्पर्धा व दलालांचा विळखा यामुळे बागायतदार आधीच जेरीला आला आहे. त्यामुळे सामूहिक निर्णय व सहकार्य यांच्याच जोरावर आता आंबा बागायतदार कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार व्हायला हवा, असेच म्हणावे लागेल.