शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांकडून निर्वाणीच्या उपायांवर भर

By admin | Updated: July 10, 2014 00:11 IST

तुुडतुड्यांच्या हल्ल्याने हतबलता : पावसाच्या ओढीची प्रतीक्षा

नरेंद्र बोडस - देवगडनिसर्गचक्रच बदलल्यामुळे कधी नव्हे एवढी बागायतदारांची हतबलता पुढे आली आहे. तुडतुड्याच्या प्रचंड हल्ल्यामुळे काही प्रमाणात फवारण्या केल्याशिवाय हा हल्ला परतवून लावणे अशक्य होणार आहे. परंतु फवारणीपूर्वी व नंतर किमान एक ते दोन दिवस पावसाने ओढ दिल्याशिवाय फवारणीचा परिणाम होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असल्याने अशाप्रकारची संधी बागायतदारांना मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच कोवळी पालवी त्यांच्या भक्ष्यस्थानी पडून झाडे पुन्हा पालवण्याची प्रक्रिया कालांतराने सुरु होईल व म्हणूनच आंबा हंगाम पुढे जाईल अशी भीती बागायतदारांना वाटत आहे. पावसाने जोर धरला तरी किटकनाशक फवारणी न करता संजीवके वापरण्याचा कालावधी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्याअखेर लांबवता येत नाही. पालवी नष्ट झाल्याने संजीवकाचा तसाच वापर करणे किंवा पावसाअभावी खतांचा डोस यापूर्वी न देता आल्याने तो आता देऊन मग संजीवकाचा डोस लांबवणेही आंबा बागायतदारांना स्वतंत्रपणे वेळापत्रक आखून करता येणे शक्य होत नाही. किटकनाशक फवारणीसाठी काळ अनुकूल असल्यास सायपर मेश्रीन, इमिडा यांची फवारणी आंबा कलमांवर करावी लागेल. त्याबरोबर डी डी इ पी (डायक्लोरोव्हास)ची फवारणीही करणे उपयुक्त ठरेल, असे जाणकार आंबा बागायतदार सुनिल कुलकर्णी यांचे हे मत आहे.देवगड तालुक्यात सध्या कुणकेश्वर, मिठमुंबरी, तारामुंबरी आदी भागात पालवीची फूट अद्याप पुरेशी नाही तर विजयदुर्ग पट्ट्यात कलमे उत्तमप्रकारे पालवल्याचे चित्र आहे. याठिकाणी नवीन पालवीची जपणूक होणे गरजेचे आहे. फवारणी करणे जरुरीचे ठरत असल्याने आंबा बागायतदारांनी खताचे डोस देणे पावसाच्या ओढीमुळे लांबवले आहे. आता पाऊस सुरु झाल्याने खतांचे डोस देणे बागायतदार या आठवड्यात उरकून घेतील. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या फरकाने संजीवकाचा डोस देणे सुरु करता येईल. मात्र, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर संजीवकाचा डोस देणे अजिबात फायदेशीर ठरणार नाही याचीही जाणीव बागायतदारांना आहे. निसर्गचक्राच्या फेऱ्यात आंबा बागायतदार यंदा सापडला आहे. अगतिकता व हतबलता यांची दाहक जाणीव करून देणारे असेच हे वातावरण आहे. जर-तर च्या चक्रात सापडून चुकीचे निर्णय व उत्पादन खर्चातील वाढीला आमंत्रण देणे यानंतरच्या कठीण काळात आंबा बागायतदाराला मुळीच परवडणारे नाही. कारण स्पर्धा व दलालांचा विळखा यामुळे बागायतदार आधीच जेरीला आला आहे. त्यामुळे सामूहिक निर्णय व सहकार्य यांच्याच जोरावर आता आंबा बागायतदार कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार व्हायला हवा, असेच म्हणावे लागेल.