शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बागायतदारांकडून निर्वाणीच्या उपायांवर भर

By admin | Updated: July 10, 2014 00:11 IST

तुुडतुड्यांच्या हल्ल्याने हतबलता : पावसाच्या ओढीची प्रतीक्षा

नरेंद्र बोडस - देवगडनिसर्गचक्रच बदलल्यामुळे कधी नव्हे एवढी बागायतदारांची हतबलता पुढे आली आहे. तुडतुड्याच्या प्रचंड हल्ल्यामुळे काही प्रमाणात फवारण्या केल्याशिवाय हा हल्ला परतवून लावणे अशक्य होणार आहे. परंतु फवारणीपूर्वी व नंतर किमान एक ते दोन दिवस पावसाने ओढ दिल्याशिवाय फवारणीचा परिणाम होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असल्याने अशाप्रकारची संधी बागायतदारांना मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच कोवळी पालवी त्यांच्या भक्ष्यस्थानी पडून झाडे पुन्हा पालवण्याची प्रक्रिया कालांतराने सुरु होईल व म्हणूनच आंबा हंगाम पुढे जाईल अशी भीती बागायतदारांना वाटत आहे. पावसाने जोर धरला तरी किटकनाशक फवारणी न करता संजीवके वापरण्याचा कालावधी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्याअखेर लांबवता येत नाही. पालवी नष्ट झाल्याने संजीवकाचा तसाच वापर करणे किंवा पावसाअभावी खतांचा डोस यापूर्वी न देता आल्याने तो आता देऊन मग संजीवकाचा डोस लांबवणेही आंबा बागायतदारांना स्वतंत्रपणे वेळापत्रक आखून करता येणे शक्य होत नाही. किटकनाशक फवारणीसाठी काळ अनुकूल असल्यास सायपर मेश्रीन, इमिडा यांची फवारणी आंबा कलमांवर करावी लागेल. त्याबरोबर डी डी इ पी (डायक्लोरोव्हास)ची फवारणीही करणे उपयुक्त ठरेल, असे जाणकार आंबा बागायतदार सुनिल कुलकर्णी यांचे हे मत आहे.देवगड तालुक्यात सध्या कुणकेश्वर, मिठमुंबरी, तारामुंबरी आदी भागात पालवीची फूट अद्याप पुरेशी नाही तर विजयदुर्ग पट्ट्यात कलमे उत्तमप्रकारे पालवल्याचे चित्र आहे. याठिकाणी नवीन पालवीची जपणूक होणे गरजेचे आहे. फवारणी करणे जरुरीचे ठरत असल्याने आंबा बागायतदारांनी खताचे डोस देणे पावसाच्या ओढीमुळे लांबवले आहे. आता पाऊस सुरु झाल्याने खतांचे डोस देणे बागायतदार या आठवड्यात उरकून घेतील. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या फरकाने संजीवकाचा डोस देणे सुरु करता येईल. मात्र, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर संजीवकाचा डोस देणे अजिबात फायदेशीर ठरणार नाही याचीही जाणीव बागायतदारांना आहे. निसर्गचक्राच्या फेऱ्यात आंबा बागायतदार यंदा सापडला आहे. अगतिकता व हतबलता यांची दाहक जाणीव करून देणारे असेच हे वातावरण आहे. जर-तर च्या चक्रात सापडून चुकीचे निर्णय व उत्पादन खर्चातील वाढीला आमंत्रण देणे यानंतरच्या कठीण काळात आंबा बागायतदाराला मुळीच परवडणारे नाही. कारण स्पर्धा व दलालांचा विळखा यामुळे बागायतदार आधीच जेरीला आला आहे. त्यामुळे सामूहिक निर्णय व सहकार्य यांच्याच जोरावर आता आंबा बागायतदार कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार व्हायला हवा, असेच म्हणावे लागेल.