शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांकडून निर्वाणीच्या उपायांवर भर

By admin | Updated: July 10, 2014 00:11 IST

तुुडतुड्यांच्या हल्ल्याने हतबलता : पावसाच्या ओढीची प्रतीक्षा

नरेंद्र बोडस - देवगडनिसर्गचक्रच बदलल्यामुळे कधी नव्हे एवढी बागायतदारांची हतबलता पुढे आली आहे. तुडतुड्याच्या प्रचंड हल्ल्यामुळे काही प्रमाणात फवारण्या केल्याशिवाय हा हल्ला परतवून लावणे अशक्य होणार आहे. परंतु फवारणीपूर्वी व नंतर किमान एक ते दोन दिवस पावसाने ओढ दिल्याशिवाय फवारणीचा परिणाम होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असल्याने अशाप्रकारची संधी बागायतदारांना मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणूनच कोवळी पालवी त्यांच्या भक्ष्यस्थानी पडून झाडे पुन्हा पालवण्याची प्रक्रिया कालांतराने सुरु होईल व म्हणूनच आंबा हंगाम पुढे जाईल अशी भीती बागायतदारांना वाटत आहे. पावसाने जोर धरला तरी किटकनाशक फवारणी न करता संजीवके वापरण्याचा कालावधी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्याअखेर लांबवता येत नाही. पालवी नष्ट झाल्याने संजीवकाचा तसाच वापर करणे किंवा पावसाअभावी खतांचा डोस यापूर्वी न देता आल्याने तो आता देऊन मग संजीवकाचा डोस लांबवणेही आंबा बागायतदारांना स्वतंत्रपणे वेळापत्रक आखून करता येणे शक्य होत नाही. किटकनाशक फवारणीसाठी काळ अनुकूल असल्यास सायपर मेश्रीन, इमिडा यांची फवारणी आंबा कलमांवर करावी लागेल. त्याबरोबर डी डी इ पी (डायक्लोरोव्हास)ची फवारणीही करणे उपयुक्त ठरेल, असे जाणकार आंबा बागायतदार सुनिल कुलकर्णी यांचे हे मत आहे.देवगड तालुक्यात सध्या कुणकेश्वर, मिठमुंबरी, तारामुंबरी आदी भागात पालवीची फूट अद्याप पुरेशी नाही तर विजयदुर्ग पट्ट्यात कलमे उत्तमप्रकारे पालवल्याचे चित्र आहे. याठिकाणी नवीन पालवीची जपणूक होणे गरजेचे आहे. फवारणी करणे जरुरीचे ठरत असल्याने आंबा बागायतदारांनी खताचे डोस देणे पावसाच्या ओढीमुळे लांबवले आहे. आता पाऊस सुरु झाल्याने खतांचे डोस देणे बागायतदार या आठवड्यात उरकून घेतील. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या फरकाने संजीवकाचा डोस देणे सुरु करता येईल. मात्र, आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर संजीवकाचा डोस देणे अजिबात फायदेशीर ठरणार नाही याचीही जाणीव बागायतदारांना आहे. निसर्गचक्राच्या फेऱ्यात आंबा बागायतदार यंदा सापडला आहे. अगतिकता व हतबलता यांची दाहक जाणीव करून देणारे असेच हे वातावरण आहे. जर-तर च्या चक्रात सापडून चुकीचे निर्णय व उत्पादन खर्चातील वाढीला आमंत्रण देणे यानंतरच्या कठीण काळात आंबा बागायतदाराला मुळीच परवडणारे नाही. कारण स्पर्धा व दलालांचा विळखा यामुळे बागायतदार आधीच जेरीला आला आहे. त्यामुळे सामूहिक निर्णय व सहकार्य यांच्याच जोरावर आता आंबा बागायतदार कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार व्हायला हवा, असेच म्हणावे लागेल.