शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यदायी शेतीवर भर द्यावा

By admin | Updated: March 28, 2015 00:07 IST

बाळासाहेब परुळेकर : तळवडे येथील शेतकरी मेळावा

सावंतवाडी : रासायनिक शेतीमुळे घरच मेडिकल स्टोअर्स बनले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅरगॅनिक फेडरेशनची स्थापना करून सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याचे ठरवून शेतकऱ्यांत जागृती करावी. तसेच आरोग्यदायी शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब परूळेकर यांनी केले. तळवडे येथे विभागीय शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी तळवडे, होडावडा, निरवडे, वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक झिपा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर, सचिव रामानंद शिरोडकर, कोषाध्यक्ष रणजित सावंत, संचालक प्रगतशील शेतकरी सचिन दळवी, सुरेश परब, माजी जिल्हा परिषद प्रकाश परब, आत्माचे जिल्हा सदस्य रमाकांत मल्हार, आजगाव सोसायटी चेअरमन एकनाथ नारोजी, माजी सभापती रमेश गावकर, नवसो परब, अभिमन्यू लोंढे उपस्थित होते.सिंधुदुर्गात सेंद्रिय हरितक्रांतीची चळवळ निर्माण करण्यासाठी असे शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. आपण घराच्या परसबागेतही सेंद्रिय भाजीपाला निर्माण करू शकतो. सेंद्रिय शेतीत गाय, निसर्ग हा महत्त्वाचा घटक आहे, असे परूळेकर यांनी सांगितले. प्रकाश परब यांनी कृषिक्रांती घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी कृषी व पर्यटन विकासाला सर्वांनी साथ द्यावी, असे सांगितले. संस्था सचिव रामानंद शिरोडकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. तळवडेचे ज्येष्ठ नागरिक झिपा सावंत यांनी रानमोडी, लाजरीचा बागायतींना होणारा त्रास सांगितला. रासायनिक खतांनी शेतीचे तोटे सांगितले. रमाकांत मल्हार यांनी आरोग्यदायी शेतीबाबत विवेचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर यांनी सूर्य उपासना, मंत्रोपासना करून शेतीतील यश कसे संपादन करता येते, साप, बेडूक, सरडे, आदी प्राण्यांचेही प्रमाण कमी होत असल्याने शेतीला फटका बसत असल्याचे सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष रणजित सावंत यांनी सूत्रसंचालन, सखाराम पेडणेकर यांनी मांडणी केली. यावेळी दत्ता खोत, सुनील धुरी, आनंद रावते, सुमित भोसले, आदींचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)