शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

उदयनराजे, शेतकऱ्यांसाठी एकदा तरी कॉलर उडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:03 IST

लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संघटनेला सहकार्य करावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्र्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देउदयनराजे शेतकऱ्यांसाठी एकदा तरी कॉलर उडवाबळीराजा शेतकरी संघटना लढवणार लोकसभेची निवडणूक :  पंजाबराव पाटील 

कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संघटनेला सहकार्य करावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्र्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जीवनावश्यक कायद्यातून सर्व शेतमाल वगळला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे नवीन कायदे बनवले पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना ताकद मिळावी व त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी बळीराजा शेतकरी संघटना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. येणारी निवडणूक ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक असणार आहे.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बी. जी. पाटील, जिल्हाद्यक्ष साजिद मुल्ला, उन्मेष देशमुख, भीमाशंकर बिराजदार आदी उपस्थित होते.पंजाबराव पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. सगळ्याच चाव्या बारामतीतून फिरताना दिसत आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा आहे, त्यांचा विचार आज जिल्ह्यात कुठेही जोपासलेला पाहायला मिळत नाही.

बारामतीच्या चाव्यांवर सातारा जिल्ह्यातील खासदार आणि आमदार पळत आहेत. सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्यातला माणूस प्रतिनिधी असला पाहिजे म्हणून सातारा जिल्ह्यातून बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी बी. जी. पाटील म्हणाले, आता कोणाची जिरवायची आणि कोणाला हरवायचं, यापेक्षा लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवून ती जिंकायची, असा मी निर्णय घेतला आहे. रयतेचा जाहीरनामा आम्ही तयार करत असून, तो घेऊन येणारी निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार आहोत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Satara areaसातारा परिसर