शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

उदयनराजे, शेतकऱ्यांसाठी एकदा तरी कॉलर उडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:03 IST

लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संघटनेला सहकार्य करावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्र्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देउदयनराजे शेतकऱ्यांसाठी एकदा तरी कॉलर उडवाबळीराजा शेतकरी संघटना लढवणार लोकसभेची निवडणूक :  पंजाबराव पाटील 

कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत सांगायचे झाले तर लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त कॉलर उडवण्याचे काम केलेले आहे. त्यांनी एकदा शेतकऱ्यांसाठी कॉलर उडवावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संघटनेला सहकार्य करावे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्र्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जीवनावश्यक कायद्यातून सर्व शेतमाल वगळला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे नवीन कायदे बनवले पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना ताकद मिळावी व त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी बळीराजा शेतकरी संघटना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. येणारी निवडणूक ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक असणार आहे.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बी. जी. पाटील, जिल्हाद्यक्ष साजिद मुल्ला, उन्मेष देशमुख, भीमाशंकर बिराजदार आदी उपस्थित होते.पंजाबराव पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. सगळ्याच चाव्या बारामतीतून फिरताना दिसत आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा आहे, त्यांचा विचार आज जिल्ह्यात कुठेही जोपासलेला पाहायला मिळत नाही.

बारामतीच्या चाव्यांवर सातारा जिल्ह्यातील खासदार आणि आमदार पळत आहेत. सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्यातला माणूस प्रतिनिधी असला पाहिजे म्हणून सातारा जिल्ह्यातून बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी बी. जी. पाटील म्हणाले, आता कोणाची जिरवायची आणि कोणाला हरवायचं, यापेक्षा लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवून ती जिंकायची, असा मी निर्णय घेतला आहे. रयतेचा जाहीरनामा आम्ही तयार करत असून, तो घेऊन येणारी निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार आहोत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Satara areaसातारा परिसर