शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

मासेमारीसाठी नेऊन मित्रानेच केला घात

By admin | Updated: November 27, 2015 00:43 IST

तळवडेतून एकजण ताब्यात : प्रकाशचा खून झाल्याचे उघडकीस

सावंतवाडी : आरोंदा किरणपाणी खाडीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या प्रकाश भिवा मालवणकर (वय ५१, रा. तळवडे) यांचा साथीदाराबरोबर झालेल्या किरकोळ वादातून खून झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. प्रकाश यांचा खून सिकंदर मालवणकर (४८, रा. महाळ्येवाडी तळवडे) या त्याच्याच मित्राने केल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.तळवडे येथील प्रकाश मालवणकर व सिकंदर मालवणकर हे दोघे बुधवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजता आरोंदा येथे मच्छिमारीसाठी गेले होते. तेथे पहिल्यांदा सिकंदर हा आरोंदा खाडीपात्रात मासेमारी करीत होता, तर प्रकाश हे पुलावर बसले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दोघेही आरोंदा खाडीपात्राच्या जवळपास होते. काही स्थानिक ग्रामस्थ मासेमारीसाठी गेले होते. त्यांनीही या दोघांना पाहिले होते.रात्री आठनंतर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली व त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी सिकंदर याने(पान ३ वरून) प्रकाश यांच्या डोक्यात बुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच काही जखमा प्रकाश यांच्या पाठीवरही होत्या. त्यानंतर सिकंदर याने प्रकाश यांना खाडीत ढकलून तो तळवडे येथे घरी निघून आला. रात्री उशिरापर्यंत याची कोणतीही कल्पना घरी किंवा आजूबाजूच्या ग्रामस्थांना दिली नाही. प्रकाश घरी आले नसल्याने, त्यांचा मुलगा प्रीतम मालवणकर याने ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यावेळी सिकंदर हा प्रकाशसोबत होता, असे ग्रामस्थांना समजले. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता, सिकंदरने प्रकाश खाडीत पडला. मी घाबरून याची माहिती कुणाला दिली नाही, असे स्पष्ट केले.त्यानंतर ग्रामस्थांनी आरोंदासह परिसरात पाहणी केली. तसेच तेरेखोल येथील मच्छिमारांनी रात्रभर शोधाशोध केली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास प्रकाश मालवणकर यांचा मृतदेह तेरेखोल खाडीपात्रात मच्छिमारांना आढळून आला. त्यानंतर याची माहिती तळवडे ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मळेवाड आरोग्य केंद्रात पाठविला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली. नंतर प्रकाश यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रकाश हे शेतकरी असून त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. तळवडत खळबळप्रकाश मालवणकर हा आरोंदा खाडीत बुडला अशीच चर्चा तळवडे गावात सुरुवातीला होती. मात्र, गुरुवारी प्रकाश यांचा त्याच्याच मित्राने खून केला, अशी बातमी जेव्हा धडकली तेव्हा गावात एकच खळबळ उडाली.