शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सिंधुदुर्गात सुरू होणार मत्स्य महाविद्यालय! नितेश राणेंची माहिती 

By सुधीर राणे | Updated: October 17, 2022 16:24 IST

Nitesh Rane : कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कणकवली : सिंधुदुर्गात आता खऱ्या अर्थाने निलक्रांती होणार असून रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील देवगड तालुक्यात गिर्ये येथे मत्स्य महाविद्यालय सुरू होणार आहे.अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नितेश राणे पुढे म्हणाले , सर्वात जास्त मासेमारी कोकणात होते. तरीही मत्स्यविद्यापीठ विदर्भातील नागपूरला अशी आजवरची स्थिती होती. मात्र, शिंदे -फडणवीस सरकारने सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. २३ सप्टेंबर २०२२ रोजी संबधित खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मी मत्स्य महाविद्यालय सिंधुदुर्गात सुरू करण्याची एका पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर तत्काळ राज्य सरकारने सकारात्मक हालचाली सुरू केल्या असून लवकरच सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू होईल. हे महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाशी संलग्न असणार आहे. या महाविद्यालयासाठी २६ हेक्टर जागा आवश्यक होती. 

देवगड तालुक्यातील गिर्ये गावात जागा उपलब्ध झाली असून भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली यांनी सिंधुदुर्गात मत्स्यमहाविद्यालय सुरू करण्यास प्रथमदर्शनी सकारात्मकता दर्शवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या सागरी किनारपट्टीवर मासेमारी सुरू असते. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात कोकणावर सातत्याने अन्याय झाला. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोकण विकासासाठी असंख्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०  हजार प्रोत्साहन निधी देण्याची माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी पोकळ घोषणा केली होती. मात्र ,शिंदे -फडणवीस सरकारने प्रत्यक्ष ५० हजार प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. 

कोस्टल हायवेबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणे केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. फोंडाघाट बाजारपेठेतील रखडलेले रस्ता रुंदीकरण शिंदे-फडणवीस सरकार येताच सुरू होत आहे. यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच फोंडाघाट बाजारपेठ रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे. एकंदरीत शिंदे- फडणवीस सरकार आल्यावर कोकणच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात झाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे