शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

चार महिने मच्छीमारी बंदच; नौकामालक हवालदिल

By admin | Updated: August 26, 2016 01:12 IST

व्यवसायच डबघाईला : मच्छीमारांची आर्थिक स्थिती हलाखीची--मच्छिमारांचे भवितव्य अंधारमय भाग- २

रहिम दलाल -- रत्नागिरी  -चार महिने मासेमारी बंद राहिल्याने मच्छीमारांची परिस्थिती फार बिकट व हलाखीची बनल्याने अनेक मालकांनी नौका विक्रीला काढल्या आहेत. शासनाने घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळे चार महिने मासेमारी बंद राहिल्याने अनेक मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात सुमारे ४०० पर्ससीन नौका आहेत. एका नौकेवर सुमारे २५ ते ३० खलाशी काम करतात. त्यामुळे त्यांची एकूण संख्या पाहता १० हजार ते १२ हजार एवढी होती. शिवाय पर्ससीननेट मासेमारी व्यवसायावर जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामध्ये मासे कापणाऱ्या महिला ४०००, बर्फ कारखान्यातील कामगार ७००, टेम्पो व्यावसायिक ३००, ट्रक व्यावसायिक २००, जाळी दुरुस्त करणारे कामगार १५००, मासे खरेदी विक्री करणाऱ्या महिला व्यावसायिक ५००, मच्छी प्रक्रिया करणारे फीश मिल व्यावसायिक व कामगार १०००, मच्छी खरेदी-विक्री करणारे पुरवठादार व त्यावर अवलंबून असणारे कामगार- १००० यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सागरी अधिनियम १९८१अंतर्गत पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. त्याचे परिणाम खोलवर झाल्याचे दिसून येत आहेत. आज मासेमारी सुरु झाली असली तरी अद्याप निम्म्यापेक्षा जास्त नौका बंदरातच नांगरावर आहेत. त्यामुळे मासेमारी सुरू होऊनही चार महिने मासेमारी बंद राहिल्याने त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. मासेमारीसाठी आवश्यक असलेला खलाशीवर्ग नसल्याने अनेक नौका बंद स्थितीत आहेत. मच्छीमारांकडे पैसा नसल्याने ते डबघाईला आले आहेत. बहुतांश मच्छिमारांनी पर्ससीन जाळ्यांच्या नौका बँकांकडून, खासगी वित्त संस्थांकडून कर्ज घेऊन बांधलेल्या आहेत. तसेच अनेक मच्छीमार सावकारी कर्जाच्या पाशातही अडकले आहेत. बंदच्या कालावधीमध्ये अनेक नौकामालकांनी खलाशांसह त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा भार उचलला होता. तसेच नौकांची निगा राखण्यासाठी स्वत:कडील जमा असलेले दागदागिने विकले. येणाऱ्या हंगामामध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करुन कमाई होईल, या आशेवर खलाशांनाही अ‍ॅडव्हान्स रकमा दिल्या होत्या. मात्र, आता खलाशांनीही पाठ फिरविली. मासेमारी बंदीमुळे नौका बंद राहिल्याने बँकांचे लाखो रुपयांचे हप्ते थकले आहेत. शिवाय सावकारांकडून घेतलेल्या व्याजी रकमांचेही हप्ते वेळेवर न गेल्याने दामदुप्पटीने पैशांची वसूली करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तसेच बँकांनीही कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावल्याने नौकामालक अडचणीत आले आहेत. अनेकांनी आपल्या मासेमारी नौका विक्रीला काढल्या आहेत. काहींनी तर कर्जाचा बोजा राहू नये, यासाठी कमी किमतीत नौका विकल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे मच्छीमार आज फार हलाखीच्या स्थितीत जगत आहे. तब्बल चार महिने मासेमारी बंद राहिल्याने ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. शासनाने पर्ससीन नेटने व मिनी पर्ससीननेटने करण्यात येणारी मासेमारी अन्यायकारकरित्या बंद केल्यामुळे आज उपासमारीची वेळ आली आहे. नौकामालकांची आर्थिक स्थिती खालावल्याने त्यांच्याकडे हा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठीही पैसा हाती राहिलेला नाही. त्यामुळे अनेक मालक नौका विकून कर्ज फेडण्यासाठी धडपडत आहेत, तर अनेकांनी कमी किमतीमध्ये नौका विकल्या. त्यामुळे भवितव्य अंधारमय झाले असून, त्याचा विचार कोण करणार.- खलिफ तांडेल, मच्छिमार