शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

मच्छिमारांकडून सहकार्य आवश्यक

By admin | Updated: August 10, 2015 20:37 IST

स्वराज महापात्रा : देवगड येथे नौदलामार्फत मार्गदर्शन

देवगड : सागरी सुरक्षिततेची जबाबदारी ही मच्छिमारांवर अवलंबून असते. देशाचे नागरिक या नात्याने त्यांनी संशयास्पद बोटी, संशयास्पद वस्तूंची माहिती सुरक्षा यंत्रणेला देणे महत्त्वाचे आहे. मच्छिमारांकडून सहकार्य मिळणे हे महत्त्वाचे आहे, असे मत नौदलाचे अधिकारी स्वराज महापात्रा यांनी व्यक्त केले. तारामुंबरी मच्छिमार संस्थेच्या सभागृहात मच्छिमार व सागरी सुरक्षा दलाच्या सदस्यांना नौदलामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी देवगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, मत्स्य परवाना अधिकारी सुर्वे, नौदल विभागाचे एम. जे.शहाजी, मच्छिमार नेते भाई खोबरेकर, देवगड मच्छिमार संस्थेचे चेअरमन व्दिजकांत कोयंडे, चंद्रकांत पाळेकर, विनायक प्रभू, अयण तोरसकर, आदी उपस्थित होते. यावेळी महापात्रा म्हणाले की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी आलेले अतिरेकी हे सागरी महामार्गानेच आले होते. त्यानंतर सागरी सुरक्षिततेवर शासनाने लक्ष केंद्रीत केले असून, अनोळखी व संशयास्पद नौका आढळल्यास मच्छिमारांनी तत्काळ सुरक्षा यंत्रणेला कल्पना द्यावी. समुद्राचा गैरवापर करून अतिरेकी या मार्गानेच प्रवेश करून हल्ले करत आहेत. याची दखल सर्वांनीच घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मच्छिमार नेते भाई खोबरेकर म्हणाले की, मच्छिमारांकडून सुरक्षा यंत्रणेला सहकार्य केले जाते आणि यापुढेही केले जाणार आहे. मात्र सुरक्षा यंत्रणेकडून मच्छिमारांना सहकार्य मिळत नसल्याची खंत खोबरेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)