शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
6
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
7
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
8
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
9
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
10
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
11
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
12
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
13
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
14
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
15
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
16
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
17
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
18
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
20
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

मच्छीमारांना समुद्रात असतानाही संपर्क शक्य

By admin | Updated: March 7, 2016 00:35 IST

विनायक राऊत : बीएसएनएल दुर्गम भागात उभारणार ९६ टॉवर्स

रत्नागिरी : आता ग्रामीण भागातही भारत दूरसंचार निगमने आपले जाळे निर्माण केले आहे. अधिकाधिक दुर्गम भागातील नागरिकांचा तसेच समुद्रातील मच्छीमारांचा संपर्क सहजगत्या व्हावा, यासाठी बीएसएनएलने नवीन ९६ टॉवर्सची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शनिवारी रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.टेलिफोन सल्लागार समितीची पहिलीच बैठक खासदार राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जेलरोड येथील संचार भवनमध्ये झाली. यावेळी समिती सदस्य बंड्या साळवी, बाळा कदम, संतोष गोवळे, बीएसएनएलचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग, महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक आर. जी. गदगकर, अमृता लेले, जनसंपर्क अधिकारी योगेश भोंगले आदी उपस्थित होते.या बैठकीत राऊत यांनी घेतलेल्या आढाव्याची माहिती पत्रकारांना दिली. बीएसएनएलचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून ४० हजार दूरध्वनी ग्राहक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख, तर रत्नागिरीत २ लाख ११ हजार मोबाईलधारक आहेत. या ग्राहकांना थ्रीजीची सेवा ८१ टॉवर्सद्वारे, तर टूजीची सेवा २२ टॉवर्सद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. २०१५ सालापासून बीएसएनएलने चांगली सेवा दिल्याने २०१० ते २०१४ या कालावधीत शेवटच्या क्रमांकावर असलेल्या बीएसएनएलने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. महाप्रबंधक सुहास कांबळे यांच्या कामाचे यावेळी राऊत यांनी कौतुक केले.समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या खलाशांना मोबाईल सेवेचा लाभ मिळत नसल्याने, संपर्क करणे अवघड बनते. संदेश वहनाची प्रक्रिया जलद होण्यासाठी आता या दोन्ही जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर २६ आणि अतिदुर्गम भागात ७६ मिळून एकूण ९६ नवीन टॉवर्स बीएसएनएलकडून उभारण्यात येणार आहेत. तसेच सेवेत खंड पडू नये, यासाठी स्थानिक बेरोजगारांना दुरूस्तीचे प्रशिक्षण देऊन ‘गाव मित्र’ म्हणून नेमण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंडणगड, खेड, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यांतील ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात फायबर आॅप्टिकल नेटवर्कने जोडल्या जाणार असून, ही प्रक्रिया ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरित पाच तालुके हे दुसऱ्या टप्प्यात जोडले जाणार आहेत. सर्व ग्रामपंचायतींना या सेवेसाठी प्रत्येकी १८ लाख रूपयांचे साहित्य केंद्राकडून मोफत दिले जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.माचाळ, नेदरवाडी, गांग्रई, यासारख्या अतिदुर्गम भागात बीएसएनएल आता प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सेवा देणार आहे. साटवलीसारख्या भागात १५ वर्षानंतर प्रथमच मोबाईल सेवा सुरू झाली आहे. बीएसएनएलचे दोन्ही जिल्ह्यात मिळून २१६ टॉवर्स सध्या कार्यरत आहेत. मोबाईलच्या कनेक्टिव्हीटीचे प्रमाण ९१.२१ टक्के इतके आहेत. २०१७ सालापर्यंत हे प्रमाण १०० टक्के होईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)बीएसएनएल : रत्नागिरी जिल्हा प्रथम.बीएसएनएलची सेवा आणि ग्राहक वाढ यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आहेत.पन्नास हजार ग्राहकगेल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्ह््यात पन्नास हजार ग्राहक वाढले आहेत. सीमकार्डचा हा खप संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे.