शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांना समुद्रात असतानाही संपर्क शक्य

By admin | Updated: March 7, 2016 00:35 IST

विनायक राऊत : बीएसएनएल दुर्गम भागात उभारणार ९६ टॉवर्स

रत्नागिरी : आता ग्रामीण भागातही भारत दूरसंचार निगमने आपले जाळे निर्माण केले आहे. अधिकाधिक दुर्गम भागातील नागरिकांचा तसेच समुद्रातील मच्छीमारांचा संपर्क सहजगत्या व्हावा, यासाठी बीएसएनएलने नवीन ९६ टॉवर्सची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शनिवारी रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.टेलिफोन सल्लागार समितीची पहिलीच बैठक खासदार राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जेलरोड येथील संचार भवनमध्ये झाली. यावेळी समिती सदस्य बंड्या साळवी, बाळा कदम, संतोष गोवळे, बीएसएनएलचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग, महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक आर. जी. गदगकर, अमृता लेले, जनसंपर्क अधिकारी योगेश भोंगले आदी उपस्थित होते.या बैठकीत राऊत यांनी घेतलेल्या आढाव्याची माहिती पत्रकारांना दिली. बीएसएनएलचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून ४० हजार दूरध्वनी ग्राहक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख, तर रत्नागिरीत २ लाख ११ हजार मोबाईलधारक आहेत. या ग्राहकांना थ्रीजीची सेवा ८१ टॉवर्सद्वारे, तर टूजीची सेवा २२ टॉवर्सद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. २०१५ सालापासून बीएसएनएलने चांगली सेवा दिल्याने २०१० ते २०१४ या कालावधीत शेवटच्या क्रमांकावर असलेल्या बीएसएनएलने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. महाप्रबंधक सुहास कांबळे यांच्या कामाचे यावेळी राऊत यांनी कौतुक केले.समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या खलाशांना मोबाईल सेवेचा लाभ मिळत नसल्याने, संपर्क करणे अवघड बनते. संदेश वहनाची प्रक्रिया जलद होण्यासाठी आता या दोन्ही जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर २६ आणि अतिदुर्गम भागात ७६ मिळून एकूण ९६ नवीन टॉवर्स बीएसएनएलकडून उभारण्यात येणार आहेत. तसेच सेवेत खंड पडू नये, यासाठी स्थानिक बेरोजगारांना दुरूस्तीचे प्रशिक्षण देऊन ‘गाव मित्र’ म्हणून नेमण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंडणगड, खेड, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यांतील ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात फायबर आॅप्टिकल नेटवर्कने जोडल्या जाणार असून, ही प्रक्रिया ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरित पाच तालुके हे दुसऱ्या टप्प्यात जोडले जाणार आहेत. सर्व ग्रामपंचायतींना या सेवेसाठी प्रत्येकी १८ लाख रूपयांचे साहित्य केंद्राकडून मोफत दिले जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.माचाळ, नेदरवाडी, गांग्रई, यासारख्या अतिदुर्गम भागात बीएसएनएल आता प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सेवा देणार आहे. साटवलीसारख्या भागात १५ वर्षानंतर प्रथमच मोबाईल सेवा सुरू झाली आहे. बीएसएनएलचे दोन्ही जिल्ह्यात मिळून २१६ टॉवर्स सध्या कार्यरत आहेत. मोबाईलच्या कनेक्टिव्हीटीचे प्रमाण ९१.२१ टक्के इतके आहेत. २०१७ सालापर्यंत हे प्रमाण १०० टक्के होईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)बीएसएनएल : रत्नागिरी जिल्हा प्रथम.बीएसएनएलची सेवा आणि ग्राहक वाढ यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आहेत.पन्नास हजार ग्राहकगेल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्ह््यात पन्नास हजार ग्राहक वाढले आहेत. सीमकार्डचा हा खप संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे.