शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांना समुद्रात असतानाही संपर्क शक्य

By admin | Updated: March 7, 2016 00:35 IST

विनायक राऊत : बीएसएनएल दुर्गम भागात उभारणार ९६ टॉवर्स

रत्नागिरी : आता ग्रामीण भागातही भारत दूरसंचार निगमने आपले जाळे निर्माण केले आहे. अधिकाधिक दुर्गम भागातील नागरिकांचा तसेच समुद्रातील मच्छीमारांचा संपर्क सहजगत्या व्हावा, यासाठी बीएसएनएलने नवीन ९६ टॉवर्सची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शनिवारी रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.टेलिफोन सल्लागार समितीची पहिलीच बैठक खासदार राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जेलरोड येथील संचार भवनमध्ये झाली. यावेळी समिती सदस्य बंड्या साळवी, बाळा कदम, संतोष गोवळे, बीएसएनएलचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग, महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक आर. जी. गदगकर, अमृता लेले, जनसंपर्क अधिकारी योगेश भोंगले आदी उपस्थित होते.या बैठकीत राऊत यांनी घेतलेल्या आढाव्याची माहिती पत्रकारांना दिली. बीएसएनएलचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळून ४० हजार दूरध्वनी ग्राहक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख, तर रत्नागिरीत २ लाख ११ हजार मोबाईलधारक आहेत. या ग्राहकांना थ्रीजीची सेवा ८१ टॉवर्सद्वारे, तर टूजीची सेवा २२ टॉवर्सद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. २०१५ सालापासून बीएसएनएलने चांगली सेवा दिल्याने २०१० ते २०१४ या कालावधीत शेवटच्या क्रमांकावर असलेल्या बीएसएनएलने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. महाप्रबंधक सुहास कांबळे यांच्या कामाचे यावेळी राऊत यांनी कौतुक केले.समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या खलाशांना मोबाईल सेवेचा लाभ मिळत नसल्याने, संपर्क करणे अवघड बनते. संदेश वहनाची प्रक्रिया जलद होण्यासाठी आता या दोन्ही जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर २६ आणि अतिदुर्गम भागात ७६ मिळून एकूण ९६ नवीन टॉवर्स बीएसएनएलकडून उभारण्यात येणार आहेत. तसेच सेवेत खंड पडू नये, यासाठी स्थानिक बेरोजगारांना दुरूस्तीचे प्रशिक्षण देऊन ‘गाव मित्र’ म्हणून नेमण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंडणगड, खेड, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यांतील ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात फायबर आॅप्टिकल नेटवर्कने जोडल्या जाणार असून, ही प्रक्रिया ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरित पाच तालुके हे दुसऱ्या टप्प्यात जोडले जाणार आहेत. सर्व ग्रामपंचायतींना या सेवेसाठी प्रत्येकी १८ लाख रूपयांचे साहित्य केंद्राकडून मोफत दिले जाणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.माचाळ, नेदरवाडी, गांग्रई, यासारख्या अतिदुर्गम भागात बीएसएनएल आता प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सेवा देणार आहे. साटवलीसारख्या भागात १५ वर्षानंतर प्रथमच मोबाईल सेवा सुरू झाली आहे. बीएसएनएलचे दोन्ही जिल्ह्यात मिळून २१६ टॉवर्स सध्या कार्यरत आहेत. मोबाईलच्या कनेक्टिव्हीटीचे प्रमाण ९१.२१ टक्के इतके आहेत. २०१७ सालापर्यंत हे प्रमाण १०० टक्के होईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)बीएसएनएल : रत्नागिरी जिल्हा प्रथम.बीएसएनएलची सेवा आणि ग्राहक वाढ यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आहेत.पन्नास हजार ग्राहकगेल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्ह््यात पन्नास हजार ग्राहक वाढले आहेत. सीमकार्डचा हा खप संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे.