शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नौकांच्या अतिक्रमणाने मत्स्यसंपदा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:13 IST

सिद्धेश आचरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याची किनारपट्टी मच्छिमार समाजासाठी संघर्षमय राहिली आहे. कायद्यातील पळवाटा आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या यंत्रणेपुढे मच्छिमार बांधव हतबल झाला आहे. शिवाय न्याय मिळण्यासाठी लढा देणारे मच्छिमार शासनाच्या कायद्यात ‘गुन्हेगार’ ठरले आहेत. योद्ध्या मच्छिमारांचे हात कायद्याने बांधले गेल्याने गेल्या दोन महिन्यात प्रचंड प्रमाणात ...

सिद्धेश आचरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याची किनारपट्टी मच्छिमार समाजासाठी संघर्षमय राहिली आहे. कायद्यातील पळवाटा आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या यंत्रणेपुढे मच्छिमार बांधव हतबल झाला आहे. शिवाय न्याय मिळण्यासाठी लढा देणारे मच्छिमार शासनाच्या कायद्यात ‘गुन्हेगार’ ठरले आहेत. योद्ध्या मच्छिमारांचे हात कायद्याने बांधले गेल्याने गेल्या दोन महिन्यात प्रचंड प्रमाणात परराज्यातील हायस्पीड नौकांकडून अतिरेकी मासेमारी सुरू आहे. किनारपट्टीवर ‘झुंडी’ने अतिक्रमण करणाऱ्या त्या नौकांकडून मत्स्य संपदा नष्ट केली जात आहे.दरम्यान, भाजप-शिवसेना युती शासनाने अतिरेकी मासेमारी रोखण्यासाठी अध्यादेश पारित करून मच्छिमारांना दिलासा दिला. मात्र त्यात पर्ससीन व हायस्पीडधारकांनी पळवाटा शोधत पहिल्याप्रमाणे मासेमारी सुरूच ठेवली. मात्र हीच मत्स्य दुष्काळ आणणारी मासेमारी रोखण्यास शासन अपयशी ठरले आहे. सक्षम कारवाई धोरणाअभावी सरकार मत्स्य साठे संवर्धनासाठी ‘सुवर्णमध्य’ काढण्यास पुढाकार घेताना दिसत नसल्याने मच्छिमारवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.सिंधुदुर्ग किनारपट्टीकडे संघर्षाची धगधगती किनारपट्टी म्हणून पाहिले जाते. यांत्रिकी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांनी लढा सुरू केला. या लढ्यात सातत्य राहिले आणि निवती व आचरा राडाप्रकरण झाल्यानंतर शासनाने अध्यादेश जारी केला. त्यानंतर केंद्र सरकारने विध्वंसकारी एलईडी मासेमारीविरोधात सुधारित अध्यादेश काढून देशभरातील मच्छिमारांना दिलासा दिला. मात्र सरकार एकीकडे मच्छिमारांच्या हिताचे निर्णय घेत असताना शासनाची कायदे राबविणारी यंत्रणा काहीच कारवाई करताना दिसत नाही. अनेक प्रजातींची मत्स्यसंपदा असलेल्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेला मासेमारीचा अतिरेक रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मच्छिमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष सरकारने स्थापन करावा, अशी मागणी मच्छिमार करीत आहेत. भाजप सरकारने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापनेचा दिलेला शब्द पूर्ण केलेला नाही. अद्ययावत यंत्रणा उभारून अनधिकृत मासेमारी रोखणे शक्य आहे. याचा सरकारने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मत्स्य विभाग नेहमीच अपयशी ठरत असल्याचे सिद्ध होत असल्याने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष होण्याची आवश्यकता आहे.परराज्यातील नौकांना अभय का?बहुतेकवेळा परराज्यातील नौकांना अभय दिल्याचा संशय मच्छिमार व्यक्त करतात. अलीकडील काळात परराज्यातील हायस्पीड नौकांनी धुडगूस घातला असताना प्रशासन मात्र निद्रिस्तच आहे. मच्छिमारांनी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. कायदा-सुव्यवस्था बिघडली जाते. या साºया प्रकारात परप्रांतीयांना अभय मिळते. मच्छिमारांनी एखाद्या ठिकाणी घुसखोरी सुरू असल्याचे सांगितले तर प्रशासनाकडून केवळ गस्त घातली जाते, मात्र त्यावर कडक कारवाई केली जात नसल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.मच्छिमारांचे हात कायद्याने बांधलेलेअतिरेकी मासेमारीविरोधात दोन हात करणाºया लढवय्या मच्छिमारांचे हात कायद्याच्या बडग्यापुढे बांधले गेले आहेत. प्रशासन कारवाई करण्यास सरसावत नसले तरी मच्छिमारांमध्ये हायस्पीड नौका जेरबंद करण्याची धमक आहे. मात्र त्यांनी नौका पकडल्यावर त्यांच्यावर कायद्याचे बोट ठेवून त्यांचे हात बांधण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे तोंडचा घास हिरावून नेणाºया नौकांकडे मच्छिमारांना हात बांधून बघावे लागत आहे.