शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

मासळीच्या लिलावाने हर्णै गजबजले

By admin | Updated: August 23, 2015 00:39 IST

संकट तुर्तास टळले : व्यापारी-मच्छीमारांच्या वादावर तोडगा

दापोली : हर्णै बंदरात मच्छीमार व व्यापारी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली होती. परंतु मच्छीमारांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात यश आल्याने हर्णै बंदरावर आलेले संकट तुर्तास टळल्याने हर्णै बंदरातील मच्छी लिलाव सुरु होऊन बंदर पुन्हा गजबजले आहे. हंगामाच्या सुरुवातीला मासळीला फारसा दर मिळत नाहीत, सुरुवातीच्या काळात बोटमालक व खलाशी यांच्यात समान हिस्सा असतो. त्यामुळे बोटीची डागडुजी, देखभाल, हप्ता, डिझेल इतर खर्च बोटमालकाला भागवावा लागतो. परंतु, हंगामाच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांकडून दर पाडून मासळीची खरेदी केली जाऊ लागल्याने आम्हाला दर वाढवून द्यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात होती. परंतु, दर वाढवून देण्यास व्यापाऱ्याने टाळाटाळ केल्यानेच आम्ही संघर्षासाठी रस्त्यावर उतरल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मच्छीमार व व्यापारी यांच्या संघर्षात पाच दिवस बंदरातील लिलाव ठप्प होता. मासे खरेदी करण्यासाठी व्यापारीच पुढे येत नसतील तर मासेमारी करुन आणलेल्या माशांचे काय करायचे, हा प्रश्न मच्छीमारांना पडला होता. त्यामुळे हर्णै बंदरात एकदम मंदीचे सावट पसरले होते. परंतु शुक्रवारी मच्छीमार व स्थानिक व्यापारी यांच्यात चर्चा होऊन कोळंबीला १६२ रुपये किलो तसेच टायनी कोळंबी ४५ रुपये प्रतीकिलो दर देण्याचे व्यापाऱ्यांनी बैठकीत मान्य केले. तसेच सुरमई, पापलेट दरसुद्धा योग्य देण्याचा निर्णय झाला. मच्छीमार समाजातील नेते यांनी या बैठकीत तोडगा काढण्यास मदत केली. मच्छीमार बांधवांच्यावतीने संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष रऊफ हजवाने यांनी भाग घेतला. दोन्ही बाजू समजावून घेण्यात आल्या. गेल्या हंगामात साधी कोळंबीचा दर २४५ रुपये प्रतीकिलो होता. तसेच टायणीचा दर ११० रुपये प्रतीकिलो होता. त्यामुळे तोच दर यावर्षी मिळावा असा समज मच्छीमारांचा होता. परंतु, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती घसरल्याने जागतिक बाजारपेठेत मच्छीचे दर घसरले आहेत. त्यामुळे यावर्षी मासळीचे दर कमी आहेत, असा खुलासा व्यापाऱ्यांनी केला व यावर तोडगा काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)