शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

निमतवाडी येथील ५ बागांना आग

By admin | Updated: February 7, 2015 00:14 IST

मोहोर करपला : १० लाखांच्या नुकसानीचा अंदाज

शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव-निमतवाडी येथील दातरीचे भरडमध्ये पाच शेतकऱ्यांच्या आंबा-काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून १० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.ओंबळ काझरवाडी रस्त्याला लागूनच निमतवाडी येथील शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागा आहेत. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यानजीक लागलेली आग हळूहळू बागायतीमध्ये पोहोचली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. बागायती आणि शेतकरी यांच्या घरामध्ये सुमारे दोन किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आग लागल्याचे समजेपर्यंत बहुतांश झाडे होरपळली होती. हातातोंडाशी आलेले उत्पन्न आगीत गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान शिरगांव-शेवरेचे सरपंच अमित साटम, तलाठी मधुकर बांदेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)बागेबरोबर कुंपणही जळून खाकया घटनेत दिलीप आईर यांच्या दोन बागांतील १८ वर्षांची १३० कलमे व १० काजू कलमे मोहरलेल्या स्थितीत पूर्णपणे होरपळली तर काही झाडांवर आंबा, काजू लागलेले होते. पुंडलिक सीताराम आईर यांची ३० कलमे व १०० काजू, मोतीराम शिवराम आईर यांची ५० आंबा व काजू कलमे, धाकू सीताराम राणे यांची सुमारे १५० काजू कलमे, काशिराम बापू पवार यांची २० वर्षांची १० कलमे, चंद्रकांत बयाजी जांभळे यांची गेल्या वर्षीच लागवड केलेली १० काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची माहिती समजताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तरी आग सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत धुमसत होती. या पाच बागायतींची कुंपणेही जळून खाक झाली.