शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वनविभागावर धडक मोर्चा काढणार, पाडलोस परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:17 IST

बांदा : पाडलोस येथे गव्यांचा उपद्रव सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गवा चक्क अंगणात आला. जवळच बसलेल्या ...

ठळक मुद्देवनविभागावर धडक मोर्चा काढणार, पाडलोस परिसरातील शेतकऱ्यांचा इशारागव्यांचा उपद्रव सुरुच; कामकाजावर नाराजी

बांदा : पाडलोस येथे गव्यांचा उपद्रव सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गवा चक्क अंगणात आला. जवळच बसलेल्या शेतकऱ्यांचा गव्याने पाठलाग केला. मात्र त्याने घरात पळ काढल्याने व दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. अशा घटना मडुरा परिसरात वारंवार होत असून वनविभागाकडून कोणतेही पाऊल उचलेलेले दिसून येत नाही. ग्रामस्थांच्या जिवास कोणतीही हानी झाल्यास गप्प बसणार नसून दोन दिवसांत सावंतवाडी वनविभागावर मोर्चा नेणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.शेतकरी हर्षद उदय परब यांना घराशेजारी असलेल्या वायंगणी शेतीत गवे आल्याची चाहूल लागली. त्यांनी अंगणातूनच शेतात बॅटरीचा प्रकाश टाकला असता दोनपेक्षा अधिक गवे निदर्शनास आले

. कष्ट करून फुलवलेली शेती समोरच उद्ध्वस्त होईल या भितीने शेतकरी हर्षद परब यांनी त्या गव्यांना बॅटरीच्या सहाय्याने हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील एका गव्याने चक्क त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. त्या दरम्यान परब यांच्या कुत्र्यांनी आक्रमकता दाखविल्याने गव्याने मार्ग बदलल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. हा थरारक प्रसंग सांगताना परब खूप घाबरलेले होते.पाडलोस केणीवाडा येथे पहिल्यांदा सुनील नाईक यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बाळा परब यांच्या बागेतील कामगार, आरोस जत्रोत्सवातून परतणाऱ्या दोन शेतकऱ्यावर चक्क दोन फूट अंतरावरून हुलकावणी दिली. तर दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याचे वस्तीपासून हाकेच्या अंतरावर पावलांचे ठसे मिळाले. आता तर अंगणापर्यंत गवे आल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाडलोस तसेच विलवडे गावातही गव्यांचा मुक्त संचार सुरू आहे. विलवडे हा शेतीनिष्ठ गांव म्हणून ओळखला जातो. पण शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. सरकार याकडे लक्ष देईल का? अशी शेतकऱ्यांची खंत आहे. विलवडे (टेंबवाडी) गावातील शेतकरी अर्पणा दळवी यांच्या घरासमोर एक गवा दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

दोन महिन्यांपूर्वी दळवी यांच्या घराशेजारी असलेले नाचणीचे शेत गव्यांनी एका रात्रीत फस्त केले होते. वनविभागाने फक्त पंचनामा केला. पण एकही रुपया न मिळाल्याचे दळवी यांनी सांगितले. आम्हांला तुमचा कागदोपत्री पंचनामा नको तर सरकारने गव्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग