शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

वनविभागावर धडक मोर्चा काढणार, पाडलोस परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:17 IST

बांदा : पाडलोस येथे गव्यांचा उपद्रव सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गवा चक्क अंगणात आला. जवळच बसलेल्या ...

ठळक मुद्देवनविभागावर धडक मोर्चा काढणार, पाडलोस परिसरातील शेतकऱ्यांचा इशारागव्यांचा उपद्रव सुरुच; कामकाजावर नाराजी

बांदा : पाडलोस येथे गव्यांचा उपद्रव सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गवा चक्क अंगणात आला. जवळच बसलेल्या शेतकऱ्यांचा गव्याने पाठलाग केला. मात्र त्याने घरात पळ काढल्याने व दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. अशा घटना मडुरा परिसरात वारंवार होत असून वनविभागाकडून कोणतेही पाऊल उचलेलेले दिसून येत नाही. ग्रामस्थांच्या जिवास कोणतीही हानी झाल्यास गप्प बसणार नसून दोन दिवसांत सावंतवाडी वनविभागावर मोर्चा नेणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.शेतकरी हर्षद उदय परब यांना घराशेजारी असलेल्या वायंगणी शेतीत गवे आल्याची चाहूल लागली. त्यांनी अंगणातूनच शेतात बॅटरीचा प्रकाश टाकला असता दोनपेक्षा अधिक गवे निदर्शनास आले

. कष्ट करून फुलवलेली शेती समोरच उद्ध्वस्त होईल या भितीने शेतकरी हर्षद परब यांनी त्या गव्यांना बॅटरीच्या सहाय्याने हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील एका गव्याने चक्क त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. त्या दरम्यान परब यांच्या कुत्र्यांनी आक्रमकता दाखविल्याने गव्याने मार्ग बदलल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. हा थरारक प्रसंग सांगताना परब खूप घाबरलेले होते.पाडलोस केणीवाडा येथे पहिल्यांदा सुनील नाईक यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बाळा परब यांच्या बागेतील कामगार, आरोस जत्रोत्सवातून परतणाऱ्या दोन शेतकऱ्यावर चक्क दोन फूट अंतरावरून हुलकावणी दिली. तर दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याचे वस्तीपासून हाकेच्या अंतरावर पावलांचे ठसे मिळाले. आता तर अंगणापर्यंत गवे आल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाडलोस तसेच विलवडे गावातही गव्यांचा मुक्त संचार सुरू आहे. विलवडे हा शेतीनिष्ठ गांव म्हणून ओळखला जातो. पण शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. सरकार याकडे लक्ष देईल का? अशी शेतकऱ्यांची खंत आहे. विलवडे (टेंबवाडी) गावातील शेतकरी अर्पणा दळवी यांच्या घरासमोर एक गवा दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

दोन महिन्यांपूर्वी दळवी यांच्या घराशेजारी असलेले नाचणीचे शेत गव्यांनी एका रात्रीत फस्त केले होते. वनविभागाने फक्त पंचनामा केला. पण एकही रुपया न मिळाल्याचे दळवी यांनी सांगितले. आम्हांला तुमचा कागदोपत्री पंचनामा नको तर सरकारने गव्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग