शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पावसामुळे भातशेती कुजून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:43 IST

गेले चार दिवस रेडी परिसरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे येथील भातशेती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देकोकणातील शेतकरी धास्तावला रेडी येथे सतत पावसाची हजेरीभातपिकावर परतीच्या पावसाचे सावट

बाळकृष्ण सातार्डेकर

रेडी : गेले चार दिवस रेडी परिसरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे येथील भातशेती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.

कोकण परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सक्रिय झालेल्या पावसामुळे शेतकºयांना चांगला दिलासा मिळाला होता. मे महिन्याच्या अखेरीस जमिनीची भाजणी, मशागत, नांगरणी करून तरवा काढणीची कामे व्यवस्थित पार पडली होती. अशातच हजेरी लावलेल्या पावसामुळे पेरणी, लावणी आदी कामे वेळेत पार पडली होती.

भातशेती हे कोकणातील पारंपरिक मुख्य पीक आहे. पण येथील शेती ही पावसाच्या लहरीपणावरच अवलंबून असते. यावर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी होता. रेडी गाव गेल्या ५० वर्षांपासून मायनिंग व्यवसायामुळे तसेच पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर आला आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने मळे शेतीला प्राधान्य देतात. काही प्रमाणात भरडी शेतीही केली जाते. जास्त वेतन देऊनही मजूरवर्ग मिळत नसल्याने घरातील सर्व मंडळींच्या सहभागातून शेतीची कामे केली जातात.भातपिकावर परतीच्या पावसाचे सावटसद्यस्थितीत रेडीसह शिरोडा, आरवली, टांक, आसोली, आजगाव, आरोंदा, तळवणे परिसरात भातपीक कापणीयोग्य झाले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्यावेळी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पडणाºया पावसामुळे भातपीक धोक्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास शेतीचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

कोकणातील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. अवेळी पडणारा पाऊस, कामगारांची मजुरी, शेतीचे साहित्य, महागडी खते यांचा ताळमेळ घालून शेती करताना शेतकºयाची दमछाक होते. अनेक संकटांचा सामना करून केलेल्या शेतीवर परतीच्या पावसाचे संकट आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीची जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.- किशोर वारखंडकर,शेतकरी, रेडी-म्हारतळेवाडी