शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

पावसामुळे भातशेती कुजून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:43 IST

गेले चार दिवस रेडी परिसरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे येथील भातशेती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देकोकणातील शेतकरी धास्तावला रेडी येथे सतत पावसाची हजेरीभातपिकावर परतीच्या पावसाचे सावट

बाळकृष्ण सातार्डेकर

रेडी : गेले चार दिवस रेडी परिसरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे येथील भातशेती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.

कोकण परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सक्रिय झालेल्या पावसामुळे शेतकºयांना चांगला दिलासा मिळाला होता. मे महिन्याच्या अखेरीस जमिनीची भाजणी, मशागत, नांगरणी करून तरवा काढणीची कामे व्यवस्थित पार पडली होती. अशातच हजेरी लावलेल्या पावसामुळे पेरणी, लावणी आदी कामे वेळेत पार पडली होती.

भातशेती हे कोकणातील पारंपरिक मुख्य पीक आहे. पण येथील शेती ही पावसाच्या लहरीपणावरच अवलंबून असते. यावर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी होता. रेडी गाव गेल्या ५० वर्षांपासून मायनिंग व्यवसायामुळे तसेच पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर आला आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने मळे शेतीला प्राधान्य देतात. काही प्रमाणात भरडी शेतीही केली जाते. जास्त वेतन देऊनही मजूरवर्ग मिळत नसल्याने घरातील सर्व मंडळींच्या सहभागातून शेतीची कामे केली जातात.भातपिकावर परतीच्या पावसाचे सावटसद्यस्थितीत रेडीसह शिरोडा, आरवली, टांक, आसोली, आजगाव, आरोंदा, तळवणे परिसरात भातपीक कापणीयोग्य झाले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्यावेळी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पडणाºया पावसामुळे भातपीक धोक्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास शेतीचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

कोकणातील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. अवेळी पडणारा पाऊस, कामगारांची मजुरी, शेतीचे साहित्य, महागडी खते यांचा ताळमेळ घालून शेती करताना शेतकºयाची दमछाक होते. अनेक संकटांचा सामना करून केलेल्या शेतीवर परतीच्या पावसाचे संकट आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीची जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.- किशोर वारखंडकर,शेतकरी, रेडी-म्हारतळेवाडी