शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भातशेती कुजून जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:43 IST

गेले चार दिवस रेडी परिसरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे येथील भातशेती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देकोकणातील शेतकरी धास्तावला रेडी येथे सतत पावसाची हजेरीभातपिकावर परतीच्या पावसाचे सावट

बाळकृष्ण सातार्डेकर

रेडी : गेले चार दिवस रेडी परिसरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे येथील भातशेती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.

कोकण परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सक्रिय झालेल्या पावसामुळे शेतकºयांना चांगला दिलासा मिळाला होता. मे महिन्याच्या अखेरीस जमिनीची भाजणी, मशागत, नांगरणी करून तरवा काढणीची कामे व्यवस्थित पार पडली होती. अशातच हजेरी लावलेल्या पावसामुळे पेरणी, लावणी आदी कामे वेळेत पार पडली होती.

भातशेती हे कोकणातील पारंपरिक मुख्य पीक आहे. पण येथील शेती ही पावसाच्या लहरीपणावरच अवलंबून असते. यावर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी होता. रेडी गाव गेल्या ५० वर्षांपासून मायनिंग व्यवसायामुळे तसेच पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर आला आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने मळे शेतीला प्राधान्य देतात. काही प्रमाणात भरडी शेतीही केली जाते. जास्त वेतन देऊनही मजूरवर्ग मिळत नसल्याने घरातील सर्व मंडळींच्या सहभागातून शेतीची कामे केली जातात.भातपिकावर परतीच्या पावसाचे सावटसद्यस्थितीत रेडीसह शिरोडा, आरवली, टांक, आसोली, आजगाव, आरोंदा, तळवणे परिसरात भातपीक कापणीयोग्य झाले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्यावेळी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पडणाºया पावसामुळे भातपीक धोक्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास शेतीचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

कोकणातील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. अवेळी पडणारा पाऊस, कामगारांची मजुरी, शेतीचे साहित्य, महागडी खते यांचा ताळमेळ घालून शेती करताना शेतकºयाची दमछाक होते. अनेक संकटांचा सामना करून केलेल्या शेतीवर परतीच्या पावसाचे संकट आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीची जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.- किशोर वारखंडकर,शेतकरी, रेडी-म्हारतळेवाडी