शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:23 IST

पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक  रेश्मा सावंत, के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन; घाबरून न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच निपाह तापाच्या आजाराबाबत जनतेने घाबरून जाऊ नये. काही शंका असल्यास थेट आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत सवदी यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात काही भागात जलजन्य साथरोग साथीचा आरोग्य यंत्रणेसह जनतेला सामना करावा लागतो. तसेच पावसाळा जवळ आल्याने व निपाह आजाराचा प्रादुर्भाव अन्य राज्यात वाढत असल्याने याबाबत उपाययोजना आखण्यासाठी तातडीची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे तसेच पशुसंवर्धन विभाग, वनविभाग ग्रामपंचायत विभागांसह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.गोवा राज्यात निपाहचा संशयित रुग्ण सापडला आहे. तो केरळ येथून गोवा येथे रेल्वेने आला आहे. हा प्रवासी निपाहचा संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती.

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची मंगळवारी ओरोस येथे बैठक झाली असून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. वटवाघळांच्या अधिवासांची तपासणी केली जाणार आहे. अधिवासाच्या ठिकाणांची तपासणी करून वटवाघळांची सॅम्पल तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.निपाह बाबत कक्ष स्थापन होणारनिपाह आजाराबाबत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून आवश्यकती खबरदारी घेण्यात येत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने या आजाराला घाबरून जाऊ नये. तसेच या आजाराबाबत शंका असल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.ही आहेत निपाहची लक्षणेताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे, मेंदूज्वर ही ह्यनिपाहह्ण आजाराची लक्षणे आहेत. रुग्णामध्ये ही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.पडलेली फळे खाऊ नयेतनिपाह हा आजार मुख्यत: वटवाघळामधील विषाणूंमुळे होतो. या विषाणूचा संसर्ग जंगलातील तसेच झाडावरून पडलेली फळे खाल्ल्याने होतो. त्यामुळे पडलेली तसेच वटवाघळाने खालेली फळे नागरिकांनी खाऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूsindhudurgसिंधुदुर्ग