शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:23 IST

पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक  रेश्मा सावंत, के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन; घाबरून न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच निपाह तापाच्या आजाराबाबत जनतेने घाबरून जाऊ नये. काही शंका असल्यास थेट आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत सवदी यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात काही भागात जलजन्य साथरोग साथीचा आरोग्य यंत्रणेसह जनतेला सामना करावा लागतो. तसेच पावसाळा जवळ आल्याने व निपाह आजाराचा प्रादुर्भाव अन्य राज्यात वाढत असल्याने याबाबत उपाययोजना आखण्यासाठी तातडीची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे तसेच पशुसंवर्धन विभाग, वनविभाग ग्रामपंचायत विभागांसह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.गोवा राज्यात निपाहचा संशयित रुग्ण सापडला आहे. तो केरळ येथून गोवा येथे रेल्वेने आला आहे. हा प्रवासी निपाहचा संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती.

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची मंगळवारी ओरोस येथे बैठक झाली असून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. वटवाघळांच्या अधिवासांची तपासणी केली जाणार आहे. अधिवासाच्या ठिकाणांची तपासणी करून वटवाघळांची सॅम्पल तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.निपाह बाबत कक्ष स्थापन होणारनिपाह आजाराबाबत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून आवश्यकती खबरदारी घेण्यात येत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने या आजाराला घाबरून जाऊ नये. तसेच या आजाराबाबत शंका असल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.ही आहेत निपाहची लक्षणेताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे, मेंदूज्वर ही ह्यनिपाहह्ण आजाराची लक्षणे आहेत. रुग्णामध्ये ही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.पडलेली फळे खाऊ नयेतनिपाह हा आजार मुख्यत: वटवाघळामधील विषाणूंमुळे होतो. या विषाणूचा संसर्ग जंगलातील तसेच झाडावरून पडलेली फळे खाल्ल्याने होतो. त्यामुळे पडलेली तसेच वटवाघळाने खालेली फळे नागरिकांनी खाऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूsindhudurgसिंधुदुर्ग