शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:23 IST

पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हावासीयांना निपाहची भीती, तातडीची बैठक  रेश्मा सावंत, के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन; घाबरून न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य साथरोग आणि निपाह आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून याबाबत सर्व विभागांनी आवश्यकती खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच निपाह तापाच्या आजाराबाबत जनतेने घाबरून जाऊ नये. काही शंका असल्यास थेट आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत सवदी यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात काही भागात जलजन्य साथरोग साथीचा आरोग्य यंत्रणेसह जनतेला सामना करावा लागतो. तसेच पावसाळा जवळ आल्याने व निपाह आजाराचा प्रादुर्भाव अन्य राज्यात वाढत असल्याने याबाबत उपाययोजना आखण्यासाठी तातडीची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे तसेच पशुसंवर्धन विभाग, वनविभाग ग्रामपंचायत विभागांसह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.गोवा राज्यात निपाहचा संशयित रुग्ण सापडला आहे. तो केरळ येथून गोवा येथे रेल्वेने आला आहे. हा प्रवासी निपाहचा संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती.

जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची मंगळवारी ओरोस येथे बैठक झाली असून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. वटवाघळांच्या अधिवासांची तपासणी केली जाणार आहे. अधिवासाच्या ठिकाणांची तपासणी करून वटवाघळांची सॅम्पल तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.निपाह बाबत कक्ष स्थापन होणारनिपाह आजाराबाबत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून आवश्यकती खबरदारी घेण्यात येत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने या आजाराला घाबरून जाऊ नये. तसेच या आजाराबाबत शंका असल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.ही आहेत निपाहची लक्षणेताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे, मेंदूज्वर ही ह्यनिपाहह्ण आजाराची लक्षणे आहेत. रुग्णामध्ये ही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.पडलेली फळे खाऊ नयेतनिपाह हा आजार मुख्यत: वटवाघळामधील विषाणूंमुळे होतो. या विषाणूचा संसर्ग जंगलातील तसेच झाडावरून पडलेली फळे खाल्ल्याने होतो. त्यामुळे पडलेली तसेच वटवाघळाने खालेली फळे नागरिकांनी खाऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूsindhudurgसिंधुदुर्ग