शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नुकसानीमुळे शेतकरी हवालदील

By admin | Updated: March 16, 2015 00:16 IST

जिल्ह्यातील स्थिती : अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे बळीराजा संकटात

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग -कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काजू व आंबा या दोन्ही पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तालुक्यात काजू या पिकावरच अर्थव्यवस्था असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई दिल्यास शेतकरी तरणार आहे. कोकणपट्ट्यात हवामान उष्ण असल्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे कोकणातील खास करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सुखाने जगू शकतो. या पिकांवरच येथील शेतकऱ्यांचे भवितव्य अलवंबून आहे. या पिकांवरच शेतकरी आपले कुटुंब चालवू शकतो. मात्र, हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे या पिकांना फटका बसत आहे. त्यात अवकाळी पावसाने तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून टाकले आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळे प्रमुख पिकांना फटका बसला. हवामानात सातत्याने दमटपणा असल्याने मिळणारे काजू पीक आता मिळणार नाही. काजू झाडांवरील मोहोर पूर्णपणे करपून गेला असून काजू पीक गळू लागले आहे. बोंडूही वाळू लागले आहेत. पीकधारणा बंद झाली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळाली, तरच शेतकरी तरू शकणार आहे. काजू, आंबा पिक उत्पादनात घट होणारहजारो कुटुंबे रोजगारापासून वंचित अवकाळी पावसामुळे काजू पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. हजारो कुटुुंबे रोजगारापासून वंचित राहणार असून उपासमारीचीही वेळ येणार आहे. काजू पिकावरच काजू युनिट उद्योग अवलंबून आहे. काजूचे उत्पादन घटणार आहे. प्रथमच असे संकट आल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे. - चंद्रशेखर देसाई, उद्योजक, दोडामार्गउत्पादनातील घट व्यावसायिकांना मारककाजू पिकावर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संकट आले आहे. काजू पिकावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. अवकाळी पावसाळीमुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान होणार होते. मात्र, हवामानात दमटपणा असल्याने पाण्याचे थेंब आंबा, काजूच्या मोहोरावर चिकटून राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.- शिला पाटयेकर, काजू व्यावसायिक