शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नुकसानीमुळे शेतकरी हवालदील

By admin | Updated: March 16, 2015 00:16 IST

जिल्ह्यातील स्थिती : अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे बळीराजा संकटात

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग -कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काजू व आंबा या दोन्ही पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तालुक्यात काजू या पिकावरच अर्थव्यवस्था असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई दिल्यास शेतकरी तरणार आहे. कोकणपट्ट्यात हवामान उष्ण असल्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे कोकणातील खास करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सुखाने जगू शकतो. या पिकांवरच येथील शेतकऱ्यांचे भवितव्य अलवंबून आहे. या पिकांवरच शेतकरी आपले कुटुंब चालवू शकतो. मात्र, हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे या पिकांना फटका बसत आहे. त्यात अवकाळी पावसाने तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडून टाकले आहे. चार दिवस पडलेल्या पावसामुळे प्रमुख पिकांना फटका बसला. हवामानात सातत्याने दमटपणा असल्याने मिळणारे काजू पीक आता मिळणार नाही. काजू झाडांवरील मोहोर पूर्णपणे करपून गेला असून काजू पीक गळू लागले आहे. बोंडूही वाळू लागले आहेत. पीकधारणा बंद झाली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळाली, तरच शेतकरी तरू शकणार आहे. काजू, आंबा पिक उत्पादनात घट होणारहजारो कुटुंबे रोजगारापासून वंचित अवकाळी पावसामुळे काजू पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. हजारो कुटुुंबे रोजगारापासून वंचित राहणार असून उपासमारीचीही वेळ येणार आहे. काजू पिकावरच काजू युनिट उद्योग अवलंबून आहे. काजूचे उत्पादन घटणार आहे. प्रथमच असे संकट आल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे. - चंद्रशेखर देसाई, उद्योजक, दोडामार्गउत्पादनातील घट व्यावसायिकांना मारककाजू पिकावर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संकट आले आहे. काजू पिकावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. अवकाळी पावसाळीमुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान होणार होते. मात्र, हवामानात दमटपणा असल्याने पाण्याचे थेंब आंबा, काजूच्या मोहोरावर चिकटून राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.- शिला पाटयेकर, काजू व्यावसायिक