शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

By admin | Updated: May 12, 2017 22:49 IST

हत्तींच्या पाठलागात शेतकरी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कदोडामार्ग : जंगली हत्तींनी पाठलाग केल्याने त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी पळताना खाली पडल्याने बाबरवाडीतील शेतकरी चंद्रकांत लक्ष्मण गवस (वय ६४) हे गंभीर जखमी झाले. त्यांना साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. केवळ दैव बलवत्तर म्हणून हत्तींच्या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. दरम्यान, या घटनेची माहिती हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांनी वनविभागाला दिल्यावर सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व दोडामार्गचे वनक्षेत्रपाल सचिन आठवले हेवाळेकडे रवाना झाले होते. सध्या तिलारी खोऱ्यात हत्तींच्या दोन कळपांचा वावर सुरू आहे. पूर्वी या भागात चार हत्तींचा कळप होता. मात्र, आता त्यात नव्याने आणखीन सात हत्तींच्या कळपाची भर पडली आहे. दोन दिवसांपासून हा कळप बोरयेवाडी व ठाकूरवाडीत नुकसान करीत आहे. बुधवारी व गुरुवारी रात्री तेथील महादेव ठाकूर व राजाराम ठाकूर यांच्या बागायतीत हत्तींनी घुसून नारळ, केळी व पोफळीच्या झाडांचे अतोनात नुकसान केले होते. याच माडाच्या झाडांची झावळे आणण्यासाठी चंद्रकांत गवस हे बागेत गेले होते. यादरम्यान अडगळीत असलेल्या हत्तींच्या कळपातील एका हत्तीने गवस यांच्यावर चाल केली. समोर हत्तीला बघून गवस यांची बोबडीच वळली. हत्ती त्यांचा पाठलाग करीत गवस यांच्या पाठिमागे लागला. त्याच्यापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी चंद्रकांत गवस जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत धावू लागले. मात्र, ठेच लागून खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. तोपर्यंत गवस यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ त्याठिकाणी पोहोचले होते. त्यांनी गवस यांचा पाठलाग करणाऱ्या हत्तीला जंगलात पिटाळून लावले. पुढ्यात साक्षात मृत्यू उभा असताना केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ते हत्तीच्या हल्ल्यातून बचावले. त्यांना साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेवाळे सरपंचांकडून आमरण उपोषणाचा इशारा हेवाळेत हत्ती बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ग्वाही वनविभागाने देऊन सुध्दा ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वनविभागाच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच संदीप देसाई यांनी दिला आहे.