शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

आंबा कॅनिंगमुळे बागायतदारांची पिळवणूक, किलोला २0 रूपयांचा माफक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:55 IST

देवगड तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देबागायतदारांची नाराजी, कृषी विभागाने भाव ठरवून देण्याची मागणी आंबा कॅनिंगमुळे बागायतदारांची पिळवणूक, किलोला २0 रूपयांचा माफक दर

देवगड : तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.कृषी विभागाने आंबा कॅनिंगचा भाव ठरवून द्यावा, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे. या कंपन्या पूर्णपणे येथील बागायतदारांची पिळवणूक करीत आहे. ही पिळवणूक थांबविण्यासाठी शासनाने कृषी विभागाला आंबा कॅनिंगचा भाव ठरविण्याचे अधिकार दिले तर आंबा कॅनिंग कंपन्यांची मक्तेदार संपुष्टात येईल.

याचा फायदा बागायतदारांना होऊ शकतो. या स्टॉलवर २० रुपये प्रति किलोने आंबा खरेदी केला जात आहे. हा भाव यावर्षीचा कमी उत्पन्नाचा विचार केला तर किमान ३५ रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांना किंवा बागायतदारांना मिळणे आवश्यक होते.

जून महिन्यापासून मे महिन्यापर्यंत अशी वर्षभर आंबा कलमांची मशागत करावी लागते. कलमांना मोहोर आल्यानंतर अनेक किटकनाशक फवारणीची अनेक महागडी औषधे वापरावी लागतात व अशा परिस्थितीमध्ये २० रुपये प्रति किलो बागायतदारांकडून आंबा खरेदी केली जात आहे.

यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था बागायतदारांची होण्यास आंबा कॅनिंग कंपन्याच जबाबदार असतात. मात्र कोकणातील आंबा बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही राजकीय नेतृत्व नसल्याने बागायतदार एकाकी पडत आहेत. यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी राजकीय नेत्यांनी राजू शेट्टी बनने आवश्यक आहे.गतवर्षीच्या तुलनेने आंबा कॅनिंग व्यवसाय ५0 टक्क्याहून कमीविदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते तेथील पिकांना हमीभाव मिळण्यासाठी उग्र आंदोलने व विधानसभेत आवाज उठवित असताना दिसत आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आंबा कॅनिंग व्यवसाय ५0 टक्केहून कमी असणार असल्याचे व्यावसायिकांमधून सांगण्यात येत आहे.यावर्षी आंबा पीक कमी असल्याने याचा परिणाम कॅनिंग व्यवसायावर झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत हजारो टन आंबा कॅनिंगसाठी जात होता. मात्र यावर्षी अल्प प्रमाणात आंबा असल्याने कॅनिंग व्यवसाय कुर्मगतीने सुरू झाला आहे.हा व्यवसाय जेमतेम पंधरा दिवसच चालणार आहे व या कालावधीमध्ये आंबा कॅनिंगला आंबा कमीच असणार आहे असे असताना आंबा कॅनिंगला २0 रुपये माफक दर का? असा प्रश्न बागायतदारांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग