शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची परीक्षा!

By admin | Updated: February 20, 2017 23:51 IST

जि.प., पं. स. निवडणूक : ६६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी व ९ पंचायत समितींच्या ११० गणांसाठी निवडणूक होत आहे. एकूण ६६२ उमेदवार रिंगणात आहेत. १० लाख ७१ हजार ८१५ मतदार १५६४ केंद्रांवर मतदान करणार आहेत. मातब्बरांसह सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदविले जाणार आहे. गुरुवारी (दि. २३ फेब्रुवारीला) मतमोजणी होणार असून, विविध पक्षांनी मांडलेल्या सत्तेच्या गणिताचे गूढ निकालानंतर उलगडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी २३७, तर ९ पंचायत समितींच्या ११० जागांसाठी ४२५ उमेदवार रिंगणात आहेत. बहुसंख्य ठिकाणी सेना, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. सेना-भाजप युती तुटल्यानंतरची जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील सत्तेत हातात हात घालून काम करणारे सेना, भाजप एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसची काही तालुक्यांत आघाडी झाली आहे. शिवसेनेनंतर दुसरा प्रबळ पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील पाचपैकी ३ आमदार सेनेचे, तर २ आमदार राष्ट्रवादीचे आहेत. भाजप राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. जिल्ह्यावर असलेले सेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे, तर भाजपचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सेनेने डावपेच आखले आहेत. गेल्यावेळी जिल्हा परिषदेत युतीची सत्ता होती. शिवसेनेकडे सर्वाधिक २७ सदस्यसंख्या होती. राष्ट्रवादीकडे दुसऱ्या क्रमांकाची १९ सदस्यसंख्या होती. भाजपकडे ८, कॉँग्रेसकडे ३ अपक्ष २ असे सदस्यांचे बळ होते. यावेळी सेना व भाजपची युती नाही. त्यामुळे युती म्हणून मिळालेल्या मतांचे विभाजन अटळ आहे. त्याचा फटका कोणाला अधिक बसणार हे २३ फेब्रुवारीला निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाचीही या निवडणूक प्रक्रियेकडे करडी नजर आहे. निवडणूक शांततेत व्हावी, यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधीलक्षवेधी लढती...संगमेश्वर तालुक्यातील कसबा गटात सेनेच्या रचना महाडिक, सेनेचे बंडखोर अपक्ष राजेश मुकादम, तर कोसुंब गटात भाजपचे प्रमोद अधटराव, राष्ट्रवादीच्या नेहा माने व सेनेचे रोहन बने यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. रत्नागिरीच्या शिरगाव गटात भाजप जिल्हाध्यक्ष सुरेंद्र माने यांच्या पत्नी माधवी माने व सेनेच्या स्नेहा सुकांत सावंत यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. नाचणे गटात राष्ट्रवादीचे प्रकाश रसाळ व सेना बंडखोर आणि भाजपचे उमेदवार नीलेश लाड यांच्यात, तर करबुडे गटात सेनेचे उदय बने, राष्ट्रवादीचे बाबू पाटील व भाजपचे सतीश शेवडे यांच्यात काटे की टक्कर होत आहे.