शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उमेदवारांची परीक्षा!

By admin | Updated: February 20, 2017 23:51 IST

जि.प., पं. स. निवडणूक : ६६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी व ९ पंचायत समितींच्या ११० गणांसाठी निवडणूक होत आहे. एकूण ६६२ उमेदवार रिंगणात आहेत. १० लाख ७१ हजार ८१५ मतदार १५६४ केंद्रांवर मतदान करणार आहेत. मातब्बरांसह सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदविले जाणार आहे. गुरुवारी (दि. २३ फेब्रुवारीला) मतमोजणी होणार असून, विविध पक्षांनी मांडलेल्या सत्तेच्या गणिताचे गूढ निकालानंतर उलगडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी २३७, तर ९ पंचायत समितींच्या ११० जागांसाठी ४२५ उमेदवार रिंगणात आहेत. बहुसंख्य ठिकाणी सेना, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. सेना-भाजप युती तुटल्यानंतरची जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील सत्तेत हातात हात घालून काम करणारे सेना, भाजप एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसची काही तालुक्यांत आघाडी झाली आहे. शिवसेनेनंतर दुसरा प्रबळ पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील पाचपैकी ३ आमदार सेनेचे, तर २ आमदार राष्ट्रवादीचे आहेत. भाजप राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. जिल्ह्यावर असलेले सेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे, तर भाजपचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सेनेने डावपेच आखले आहेत. गेल्यावेळी जिल्हा परिषदेत युतीची सत्ता होती. शिवसेनेकडे सर्वाधिक २७ सदस्यसंख्या होती. राष्ट्रवादीकडे दुसऱ्या क्रमांकाची १९ सदस्यसंख्या होती. भाजपकडे ८, कॉँग्रेसकडे ३ अपक्ष २ असे सदस्यांचे बळ होते. यावेळी सेना व भाजपची युती नाही. त्यामुळे युती म्हणून मिळालेल्या मतांचे विभाजन अटळ आहे. त्याचा फटका कोणाला अधिक बसणार हे २३ फेब्रुवारीला निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाचीही या निवडणूक प्रक्रियेकडे करडी नजर आहे. निवडणूक शांततेत व्हावी, यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधीलक्षवेधी लढती...संगमेश्वर तालुक्यातील कसबा गटात सेनेच्या रचना महाडिक, सेनेचे बंडखोर अपक्ष राजेश मुकादम, तर कोसुंब गटात भाजपचे प्रमोद अधटराव, राष्ट्रवादीच्या नेहा माने व सेनेचे रोहन बने यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. रत्नागिरीच्या शिरगाव गटात भाजप जिल्हाध्यक्ष सुरेंद्र माने यांच्या पत्नी माधवी माने व सेनेच्या स्नेहा सुकांत सावंत यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. नाचणे गटात राष्ट्रवादीचे प्रकाश रसाळ व सेना बंडखोर आणि भाजपचे उमेदवार नीलेश लाड यांच्यात, तर करबुडे गटात सेनेचे उदय बने, राष्ट्रवादीचे बाबू पाटील व भाजपचे सतीश शेवडे यांच्यात काटे की टक्कर होत आहे.