शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

देशासमोर प्रत्येकाने नतमस्तक झाले पाहिजे

By admin | Updated: March 28, 2016 00:08 IST

शिवरत्न शेटे : सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडीत शिवजयंती उत्सव

सावंतवाडी : शिवाजी महाराजांकडे राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांची कमतरता नव्हती. बलिदानाची भावना ही राष्ट्र भक्ती आणि ध्येयवादातून येत असते. शिवाजी महाराज ध्येयवादी होते. मतभेद कितीही ठेवा, पण आपल्या भारतमातेसमोर प्रत्येकाने नतमस्तक झालेच पाहिजे, असे कळकळीचे आवाहन शिवचरित्रकार तथा हिंदवी परिवाराचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले. ते येथील बॅ. नाथ पै सभागृहात शिवजयंतीनिमित्त सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे ‘रयतेचे राजे शिवराय आमुचे’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने रयतेतील १२ बलुतेदार व १८ पगड जातीतील २० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. शेटये यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष शामराव सावंत, नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत,माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर आदी उपस्थित होते. फक्त शिवजयंतीदिनीच ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देऊन, महारॅली काढत गुलालाची उधळण करून शिवभक्त होता येत नाही. शिवभक्त होण्यासाठी कृतीशील व्हायला हवे. भारतमाता म्हटल्यावर नतमस्तक व्हायलाच हवे. हीच खरी राष्ट्रभक्ती अन् निष्ठा आहे. जे हुतात्मे शहीद झाले आणि जे सैनिक आहेत, त्यांच्या कुटुबीयांना जपा. त्यांच्यावर प्र्रेम करा, असे आवाहन डॉ. शेटये यांनी केले. मुंबईतील २६/११ चा हल्ला म्हणजे आर्थिक, वैज्ञानिक राजधानीवर तसेच उद्याची महाशक्ती होऊ पाहत असलेल्या महाराष्ट्रावर व भारतीय ऐक्याच्या सिध्दांतावरील हल्ला व युध्द होते. या युध्दात मुंबई पोलिस शिवचरित्र नजरेसमोर ठेवून लढले. दुसरीकडे ‘भारतमाता की जय’ म्हणायला ओवेसी राजी नाहीत आणि कन्हैय्या या महाराष्ट्राचा आयडॉल होतोच कसा, असा सवाल डॉ. शेटे यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, साडेतीनशे वर्षे झाली, तरी छत्रपतींचे नाव आपण विसरू शकत नाही. मात्र, आजच्या काळातील राजकारणी काळानुसार पडद्याआड झाले. महाराष्ट्राचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वक्तव्य केलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या घोषणेवेळी छत्रपती शिवाजी महाराज हवे होते. मात्र, आजचे सरकार अणेंचे समर्थन करत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा खुर्चीवर बसण्याचा त्यांना अधिकार नाही, असे डॉ. शेटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिता रसाळ (सावंतवाडी), आनंद चव्हाण, अर्जुन शिरोडकर, भरत पानवळकर, एकनाथ आजगावकर, खेमदास नाईक, महादेव गावडे, मालती नाईक, प्रियांका दळवी (कोलगाव), रवींद्र परब (कारिवडे), श्रावण गोवेकर, सुभाष राऊळ, सुविता पावसकर, तुषार जुवेकर (माणगाव), विश्राम कांबळी (चराठा), विलास मेस्त्री, विठ्ठल कोकरे यांना गौरविण्यात आले. (वार्ताहर)