शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

देशासमोर प्रत्येकाने नतमस्तक झाले पाहिजे

By admin | Updated: March 28, 2016 00:08 IST

शिवरत्न शेटे : सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडीत शिवजयंती उत्सव

सावंतवाडी : शिवाजी महाराजांकडे राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांची कमतरता नव्हती. बलिदानाची भावना ही राष्ट्र भक्ती आणि ध्येयवादातून येत असते. शिवाजी महाराज ध्येयवादी होते. मतभेद कितीही ठेवा, पण आपल्या भारतमातेसमोर प्रत्येकाने नतमस्तक झालेच पाहिजे, असे कळकळीचे आवाहन शिवचरित्रकार तथा हिंदवी परिवाराचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले. ते येथील बॅ. नाथ पै सभागृहात शिवजयंतीनिमित्त सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे ‘रयतेचे राजे शिवराय आमुचे’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने रयतेतील १२ बलुतेदार व १८ पगड जातीतील २० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. शेटये यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष शामराव सावंत, नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत,माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर आदी उपस्थित होते. फक्त शिवजयंतीदिनीच ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देऊन, महारॅली काढत गुलालाची उधळण करून शिवभक्त होता येत नाही. शिवभक्त होण्यासाठी कृतीशील व्हायला हवे. भारतमाता म्हटल्यावर नतमस्तक व्हायलाच हवे. हीच खरी राष्ट्रभक्ती अन् निष्ठा आहे. जे हुतात्मे शहीद झाले आणि जे सैनिक आहेत, त्यांच्या कुटुबीयांना जपा. त्यांच्यावर प्र्रेम करा, असे आवाहन डॉ. शेटये यांनी केले. मुंबईतील २६/११ चा हल्ला म्हणजे आर्थिक, वैज्ञानिक राजधानीवर तसेच उद्याची महाशक्ती होऊ पाहत असलेल्या महाराष्ट्रावर व भारतीय ऐक्याच्या सिध्दांतावरील हल्ला व युध्द होते. या युध्दात मुंबई पोलिस शिवचरित्र नजरेसमोर ठेवून लढले. दुसरीकडे ‘भारतमाता की जय’ म्हणायला ओवेसी राजी नाहीत आणि कन्हैय्या या महाराष्ट्राचा आयडॉल होतोच कसा, असा सवाल डॉ. शेटे यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, साडेतीनशे वर्षे झाली, तरी छत्रपतींचे नाव आपण विसरू शकत नाही. मात्र, आजच्या काळातील राजकारणी काळानुसार पडद्याआड झाले. महाराष्ट्राचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वक्तव्य केलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या घोषणेवेळी छत्रपती शिवाजी महाराज हवे होते. मात्र, आजचे सरकार अणेंचे समर्थन करत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा खुर्चीवर बसण्याचा त्यांना अधिकार नाही, असे डॉ. शेटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिता रसाळ (सावंतवाडी), आनंद चव्हाण, अर्जुन शिरोडकर, भरत पानवळकर, एकनाथ आजगावकर, खेमदास नाईक, महादेव गावडे, मालती नाईक, प्रियांका दळवी (कोलगाव), रवींद्र परब (कारिवडे), श्रावण गोवेकर, सुभाष राऊळ, सुविता पावसकर, तुषार जुवेकर (माणगाव), विश्राम कांबळी (चराठा), विलास मेस्त्री, विठ्ठल कोकरे यांना गौरविण्यात आले. (वार्ताहर)