शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

देशासमोर प्रत्येकाने नतमस्तक झाले पाहिजे

By admin | Updated: March 28, 2016 00:08 IST

शिवरत्न शेटे : सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडीत शिवजयंती उत्सव

सावंतवाडी : शिवाजी महाराजांकडे राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांची कमतरता नव्हती. बलिदानाची भावना ही राष्ट्र भक्ती आणि ध्येयवादातून येत असते. शिवाजी महाराज ध्येयवादी होते. मतभेद कितीही ठेवा, पण आपल्या भारतमातेसमोर प्रत्येकाने नतमस्तक झालेच पाहिजे, असे कळकळीचे आवाहन शिवचरित्रकार तथा हिंदवी परिवाराचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले. ते येथील बॅ. नाथ पै सभागृहात शिवजयंतीनिमित्त सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे ‘रयतेचे राजे शिवराय आमुचे’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने रयतेतील १२ बलुतेदार व १८ पगड जातीतील २० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. शेटये यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष शामराव सावंत, नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत,माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर आदी उपस्थित होते. फक्त शिवजयंतीदिनीच ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देऊन, महारॅली काढत गुलालाची उधळण करून शिवभक्त होता येत नाही. शिवभक्त होण्यासाठी कृतीशील व्हायला हवे. भारतमाता म्हटल्यावर नतमस्तक व्हायलाच हवे. हीच खरी राष्ट्रभक्ती अन् निष्ठा आहे. जे हुतात्मे शहीद झाले आणि जे सैनिक आहेत, त्यांच्या कुटुबीयांना जपा. त्यांच्यावर प्र्रेम करा, असे आवाहन डॉ. शेटये यांनी केले. मुंबईतील २६/११ चा हल्ला म्हणजे आर्थिक, वैज्ञानिक राजधानीवर तसेच उद्याची महाशक्ती होऊ पाहत असलेल्या महाराष्ट्रावर व भारतीय ऐक्याच्या सिध्दांतावरील हल्ला व युध्द होते. या युध्दात मुंबई पोलिस शिवचरित्र नजरेसमोर ठेवून लढले. दुसरीकडे ‘भारतमाता की जय’ म्हणायला ओवेसी राजी नाहीत आणि कन्हैय्या या महाराष्ट्राचा आयडॉल होतोच कसा, असा सवाल डॉ. शेटे यांनी केला. यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, साडेतीनशे वर्षे झाली, तरी छत्रपतींचे नाव आपण विसरू शकत नाही. मात्र, आजच्या काळातील राजकारणी काळानुसार पडद्याआड झाले. महाराष्ट्राचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वक्तव्य केलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या घोषणेवेळी छत्रपती शिवाजी महाराज हवे होते. मात्र, आजचे सरकार अणेंचे समर्थन करत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा खुर्चीवर बसण्याचा त्यांना अधिकार नाही, असे डॉ. शेटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिता रसाळ (सावंतवाडी), आनंद चव्हाण, अर्जुन शिरोडकर, भरत पानवळकर, एकनाथ आजगावकर, खेमदास नाईक, महादेव गावडे, मालती नाईक, प्रियांका दळवी (कोलगाव), रवींद्र परब (कारिवडे), श्रावण गोवेकर, सुभाष राऊळ, सुविता पावसकर, तुषार जुवेकर (माणगाव), विश्राम कांबळी (चराठा), विलास मेस्त्री, विठ्ठल कोकरे यांना गौरविण्यात आले. (वार्ताहर)