शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

ध्वजदिन निधी संकलन हे प्रत्येकाचे कर्तव्य

By admin | Updated: December 11, 2015 23:46 IST

अनिल भंडारी : जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : देशाच्या व नागरिकांच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती, तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती ऋण व्यक्त करण्याकरिता ध्वजदिन निधी संकलन हे या देशाचे नागरिक म्हणून आपले परमकर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ २0१५ व विजय दिवस यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे, निवृत्त कर्नल रविकिरण कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन पेटीत निधी टाकून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २0१५ चा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, देशाच्या सीमेवर आपले सैनिक अत्यंत प्रतिकूल वातावरणात देशाचे संरक्षण करीत आहेत. त्यामुळेच आपण आपले दैनंदिन जीवन निवांत आणि सुरक्षितपणे जगत आहोत. त्यांच्यामुळेच आपण आपले स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यासाठीच आपण सदैव त्यांचे ऋणी असू. २0१४ सालाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ध्वजदिन निधीसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करून १३५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. सैनिकांना सुट्या कमी असतात. त्यामुळे जेव्हा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा सरकारी कामासाठी संबंध येतो, तेव्हा त्यांना संवेदनशीलपणे प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याने २0१४ करिता ३८ लाख ६१ हजार रुपये ध्वजदिन निधी संकलन करून १३५ टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे स्मृतिचिन्ह जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासने यांना प्रदान करण्यात आले, तसेच शहीद जवानांच्या पालकांचा आणि पत्नींचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर दहावी, बारावीत विशेष गुण संपादित केलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्मिता नलवडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुभाष शिर्के यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)देशभक्तीचा सन्मान राखाजिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, देशासाठी हुतात्मा झालेल्या शूर जवानांना अभिवादन करण्यासाठी विजय दिवस साजरा केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचा हा सन्मान आहे. लढत असताना सैनिकांपुढे जेव्हा कुटुंब किंवा देश असा पर्याय उभा राहतो, तेव्हा तो देशाची निवड करतो. इतकेच नव्हे तर स्वत: किंवा देश अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा देखील आपले शूर सैनिक देशाची निवड करतात. त्यांच्या या देशभक्तीचा सन्मान म्हणून आपण सर्वांनी ध्वजदिन निधीसाठी कर्तव्य भावनेने व सढळ हस्ते निधी देऊन सहभाग दिला पाहिजे.