शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

कृषी विकास कौन्सिल स्थापणार

By admin | Updated: February 25, 2015 00:15 IST

सुधीर सावंत : शेतकरी मेळाव्यात निर्धार

ओरोस : कोकणातील जनतेने कृषी विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे. शेतकरी बांधवांनी आपली एकजूट करून जमिनींचा शेतीतून विकास करावा. सर्वांच्या समन्वयातून कोकण कृषी विकास कौन्सिलची स्थापना करण्याचा निर्धार आपण करुया, असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आयोजित सिंधु अ‍ॅग्रो फेस्ट २०१५ च्या शेतकरी मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी प्रतिष्ठान अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कृषी अधिकारी नरेंद्र काकडे, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, डॉ. व्ही. आर. पवार, डॉ. विलास सावंत, दिनानाथ वेरणेकर, महाराष्ट्र बँकेचे डिंगणकर, राजश्री मानकामे, संतोष सावंत, वैभव पवार, कृषी कॉलेजचे प्राचार्य महेश परुळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे झालेल्या या मेळाव्यात बोलताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी कृषी विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.शेती, फळबागा, औद्योगिक वसाहती उभारून शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊया, कृषी विज्ञान केंद्र, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य देईलच मात्र कृषी विकास कौन्सिलची स्थापना करून प्रत्येक महिन्यात आढावा घेऊन काम केल्यास झपाट्याने आमूलाग्र बदल जिल्ह्यात घडू शकतो, असा विश्वास सुधीर सावंत यांनी व्यक्त केला.आमदार वैभव नाईक म्हणाले, शासनाच्या माध्यमातून जमीन विकासासाठी नवीन योजना आणायाचा प्रयत्न असून जिल्हनयातील शेतकऱ्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस म्हणाले की, कृषी विकास प्रतिष्ठानचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. शरद पवार यांनी कृषी विकासासाठी हे भवन उभारले असून यापुढेही अशा होणाऱ्या कार्यक्रमासाठी हे भवन उपलब्ध करून दिले जाईल. यावेळी ऊसतज्ज्ञ माने पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस लागवड व विकासाचे रहस्य उलगडून सांगितले व ऊस शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.दरम्यान, मुक्त विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश परुळेकर, डॉ. विलास सावंत व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त डॉ. मंदार गीते यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)६0 जणांचा गौरवयावेळी दुग्ध व्यवसाय, शेती, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती, शेळीपालन, भात, नारळ, भाजीपाला, आदी क्षेत्रांतील प्रगतशील शेतकरी व बचतगटांच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुषांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ६० जणांना गौरविण्यात आले.