शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एस्. टी. महामंडळाच्या खिशात २ कोटी

By admin | Updated: September 22, 2016 00:46 IST

गणपती बाप्पा पावले : गणेशोत्सव काळातील जादा गाड्यांमुळे उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : गणेशोत्सवात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे १३५२ जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे एक कोटी ९१ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी सन २०१५मध्ये रत्नागिरी विभागाने १३२६ गाड्या सोडल्या होत्या, त्यावेळी १ कोटी ७१ लाख ३२ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत गाड्यांच्या संख्येत २६ने वाढ झाली आहे. शिवाय उत्पन्नात २० लाख २८ हजारांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवात महामार्गावर खास जादा गाड्यांसमवेत गस्तीपथके तैनात करण्यात आली होती. चिपळूण व कशेडी येथे चेकपोस्ट, संगमेश्वर येथे दुरूस्ती केंद्र तर कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते खारेपाटण मार्गावर गस्तीपथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात आले. एस. टी.तील चालक, वाहक, सर्व कर्मचारी, अधिकारीवर्ग यांच्या सहकार्यातूनच तसेच नियोजनाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाल्याने गणेशोत्सवातील एस. टी. प्रवास सुरक्षित झाला असल्याचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावर्षी सर्वाधिक उत्पन्न चिपळूण आगाराला उत्पन्न मिळाले, तर सर्वांत कमी उत्पन्न मंडणगड आगाराला मिळाले. सन २०१३मध्ये रत्नागिरी विभागाने १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१४मध्ये विभागाने १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजारांचे उत्पन्न लाभले होते. गेल्या चार वर्षातील उत्पन्नात चढ-उतार सुरू आहे. कोकण रेल्वेव्दारे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. २०१३, २०१४ या दोन वर्षात ऐन गणेशोत्सवातच रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. गतवर्षी व यावर्षी कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होती. मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर एस. टी.ने जादा गाड्या सोडल्या होत्या. गेल्या वर्षी रत्नागिरी विभागाचे उत्पन्न कमी होते. शिवाय गाड्याही कमी गेल्या. यावर्षी सुरूवातीपासूनच एस. टी.ला मागणी राहिली होती. गणेश चतुर्थीपर्यंत प्रवाशांचे आगमन सुरू होते. गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाठी गाड्या सोडल्या होत्या. १५ तारखेपर्यंत परतीचा प्रवास सुरू होता. प्रवाशांचा एस. टी.ला चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे विभाग नियंत्रक बारटक्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मुंबईहून प्रवाशांना घेऊन १४६८ गाड्या रत्नागिरीत आल्या होत्या, तर परतीसाठी १३५२ जादा गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या. याव्यतिरिक्त दररोज ८६ नियमित फेऱ्यांव्दारे प्रवासी वाहतूक सुरू होती. २४३ गाड्यांचे ग्रुप बुकिंग प्रवाशांकडून करण्यात आले होते. सावट दूर झाले गणेशोत्सवाच्या महिनाभर आधी महाड-पोलादपूर मार्गावरील सावित्री नदीवरील पूल तुटला होता. त्यात दोन एस्. टी. बसेस वाहून गेल्या. त्याचबरोबर यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस होता. त्यामुळे जादा एस्. टी. बसेसना मिळणारा प्रतिसाद कमी होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात गतवर्षीपेक्षा यंदा एस्. टी. महामंडळाच्या बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. ४१३५२ एस. टी.च्या गाड्या ४गाड्यांच्या संख्येत २६ने वाढ ४२० लाख २८ हजाराने उत्पन्न वाढले ४गतवर्षी सोडल्या होत्या १३२६ गाड्या.