शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

संगणक शिक्षणात दुर्लक्षाची ‘एरर’

By admin | Updated: January 18, 2016 23:57 IST

जिल्हा परिषद : एकीकडे ‘डिजिटल’साठी धडपड दुसरीकडे...

रहिम दलाल -- रत्नागिरीएका बाजूला डिजिटल स्कूलसाठी प्रयत्न केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांमध्ये संगणक असूनही विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण दिले जात नसल्याने ते धूळखात पडले आहेत. असे शेकडो संगणक प्राथमिक शाळांमध्ये बंद पडलेले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान नसल्याने ते धूळखात पडले आहेत. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाल्यास भविष्यात त्यांना त्याचा फायदा होणार आहे. यासाठी शिक्षकांनी एमएस-सीआयटी कोर्स पूर्ण करण्याची सक्ती शासनाकडून करण्यात आली. तरीही आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षकांनी संगणकासाठी आवश्यक असलेले प्राथमिक स्तरावरील एमएस-सीआयटी प्रशिक्षण घेतलेले नाही. सध्याचे युग संगणकीय युग असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने प्राथमिक शाळांमध्ये संगणकाचे धडे देण्यास सुरुवात केली. बँकांचे व्यवहार, शासकीय कामकाजामध्ये संगणकाचा वापर तसेच खासगी कंपन्यांमधील कामकाजही संगणकाद्वारे केले जात असल्याने आता संगणक वापर आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनाही संगणकीय प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त झाले आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १२७९ शाळांना शिक्षण विभागाकडून संगणक संच देण्यात आले होते. त्यापैकी काही संगणक संच लोकवर्गणीतून, तर बहुतांश संगणक संच सर्वशिक्षा अभियानातून शाळांना देण्यात आले आहेत. सन २००३ - २००४ ते सन २०१२ - १३ या कालावधीत संगणकांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, आज शेकडो शाळांमधील संगणक संच बंद आहेत.या संगणकांपैकी बहुतांश संगणक संच कालबाह्य झाले आहेत. यामधील बंद असलेल्या संगणकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा भार उचलणार कोण? ही खरी मेख आहे. या बंद संगणक संचांच्या दुरुस्तीसाठी लागणारे पार्टही मिळत नाहीत. त्यामुळे शाळांमधील हे बंद संगणक शोभेच्या वस्तू बनल्या असून, मुलांना संगणक शिक्षण देण्यासाठी घेतलेले संगणकच आता बंद पडल्याने पुन्हा संगणक शिक्षणाची गाडी अडली आहे.२५ टक्के संगणक बंद : योजनेला पंख फुटले पण...संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. हे ओळखून मुलांना योग्य वयात हे शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेची धडपड होती. ती यशस्वी होईल, असे वाटत असतानाच संगणक बंद पडले.जिल्हा परिषदेच्या १२७९ शाळांमध्ये संगणक बसवण्यात आले आहेत. त्यापैकी ३५0हून अधिक संगणक बंद आहेत. दुरूस्तीला निधी नसल्याने ते सुरू होण्याची शक्यता नाही. २५ टक्के शाळांवर ही दुर्दैवी अवस्था आली आहे.शिक्षणाचा खेळखंडोबासंगणक शिक्षण देताना वीजजोडणी, दुरुस्ती देखभालीचा येणारा खर्च या सर्वच पातळ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने विचार केला नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच संगणक शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.