शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

संगणक शिक्षणात दुर्लक्षाची ‘एरर’

By admin | Updated: January 18, 2016 23:57 IST

जिल्हा परिषद : एकीकडे ‘डिजिटल’साठी धडपड दुसरीकडे...

रहिम दलाल -- रत्नागिरीएका बाजूला डिजिटल स्कूलसाठी प्रयत्न केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांमध्ये संगणक असूनही विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण दिले जात नसल्याने ते धूळखात पडले आहेत. असे शेकडो संगणक प्राथमिक शाळांमध्ये बंद पडलेले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान नसल्याने ते धूळखात पडले आहेत. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाल्यास भविष्यात त्यांना त्याचा फायदा होणार आहे. यासाठी शिक्षकांनी एमएस-सीआयटी कोर्स पूर्ण करण्याची सक्ती शासनाकडून करण्यात आली. तरीही आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षकांनी संगणकासाठी आवश्यक असलेले प्राथमिक स्तरावरील एमएस-सीआयटी प्रशिक्षण घेतलेले नाही. सध्याचे युग संगणकीय युग असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने प्राथमिक शाळांमध्ये संगणकाचे धडे देण्यास सुरुवात केली. बँकांचे व्यवहार, शासकीय कामकाजामध्ये संगणकाचा वापर तसेच खासगी कंपन्यांमधील कामकाजही संगणकाद्वारे केले जात असल्याने आता संगणक वापर आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनाही संगणकीय प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त झाले आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १२७९ शाळांना शिक्षण विभागाकडून संगणक संच देण्यात आले होते. त्यापैकी काही संगणक संच लोकवर्गणीतून, तर बहुतांश संगणक संच सर्वशिक्षा अभियानातून शाळांना देण्यात आले आहेत. सन २००३ - २००४ ते सन २०१२ - १३ या कालावधीत संगणकांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, आज शेकडो शाळांमधील संगणक संच बंद आहेत.या संगणकांपैकी बहुतांश संगणक संच कालबाह्य झाले आहेत. यामधील बंद असलेल्या संगणकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा भार उचलणार कोण? ही खरी मेख आहे. या बंद संगणक संचांच्या दुरुस्तीसाठी लागणारे पार्टही मिळत नाहीत. त्यामुळे शाळांमधील हे बंद संगणक शोभेच्या वस्तू बनल्या असून, मुलांना संगणक शिक्षण देण्यासाठी घेतलेले संगणकच आता बंद पडल्याने पुन्हा संगणक शिक्षणाची गाडी अडली आहे.२५ टक्के संगणक बंद : योजनेला पंख फुटले पण...संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. हे ओळखून मुलांना योग्य वयात हे शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेची धडपड होती. ती यशस्वी होईल, असे वाटत असतानाच संगणक बंद पडले.जिल्हा परिषदेच्या १२७९ शाळांमध्ये संगणक बसवण्यात आले आहेत. त्यापैकी ३५0हून अधिक संगणक बंद आहेत. दुरूस्तीला निधी नसल्याने ते सुरू होण्याची शक्यता नाही. २५ टक्के शाळांवर ही दुर्दैवी अवस्था आली आहे.शिक्षणाचा खेळखंडोबासंगणक शिक्षण देताना वीजजोडणी, दुरुस्ती देखभालीचा येणारा खर्च या सर्वच पातळ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने विचार केला नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच संगणक शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.