शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

संत तुकाराम वनग्राम योजनेतून साधणार पर्यावरण संतुलन

By admin | Updated: February 27, 2015 23:18 IST

कामकाजाबद्दल समाधान : शिवाजीनगर ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीची भेट, आता शिवाजीनगर राज्याच्या शर्यतीत

शिवाजी गोरे-दापोली -शासनाने पर्यावरण समतोल व वनरक्षण करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना २००६ पासून राज्यात लागूकेली ११७९९ गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करुन या योजनेचे काम सुरू झाले. संत तुकाराम महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या या योजनेचे सकारात्मक पडसाद पडायला लागले असून दापोली तालुक्यातील शिवाजीनगर ग्रामपंचायतीने संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गावाला काल राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने भेट दिली असता, या योजनेचे सकारात्मक कामे दिसून आली आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत शिवाजीनगर असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य मूल्यमापन समितीचे अध्यक्ष एस. आर. बाबर, ए. जी. जमदाडे, विभागीय वनाधिकारी मूल्यांकन एस. जी. लडखत, उपसंचालक सामाजिक वनीकरण, तुकाराम साळुंखे मुख्य वनसंरक्षक कार्य आयोजन पुणे या कमिटीने शिवाजीनगर गावाला भेट दिली असून, शिवाजीनगर ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची पाहणी केली. गावाने लोक सहभागामुळे श्रमदान केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत शिवाजीनगरचे काम उत्कष्ट असल्याचे मूल्यमापन समितीच्या निदर्शनास आले असून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर शिवाजीनगर ग्रामपंचायत आता राज्यस्तरीय बक्षीस घेण्यासाठी सज्ज झाली आहे.शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वनामध्ये अवैध चराई प्रतिबंध वन्य पशु पक्षी संरक्षण, वन्य प्राणी-पक्षी यांना पाणवठा, श्रमदान, लोकसहभाग, इंधनाचा वापर आदी अटी पूर्ण केल्या आहेत.वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पत्की यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे आनंदा हिरडीकर वनपाल अनिल दळवी, वनरक्षक, वन व्यवस्थापन अध्यक्ष संजय महाडिक, चंद्रकांत सावंत, अशोक पवार सरपंच, राजेंद्र भोळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर माने, दीपक कुंबेरे, राजेंद्र पवार, चंद्रकांत राणे, रमेश पंदेरे यांनी काम केले.‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून वने व वन्यजीव यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संत तुकाराम वनग्राम योजना शासनाने सुरु केली असून, या योजनेंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या भाग घेतील त्यामधून जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ठरणाऱ्या ३ समित्यांना अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरे बक्षीस दिले जाते. जिल्हास्तरावरील बक्षीसपात्र वनव्यवस्थापन समितीतून राज्यासाठी मूल्यमापन केले जाते. राज्यस्तरावरील ३ उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट राज्यस्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येतो. प्रथम १० लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते.बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून शिवाजीनगर गावाने गावातील विहिरीला बंदिस्त जाळी बसवून बिबट्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.