शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

संत तुकाराम वनग्राम योजनेतून साधणार पर्यावरण संतुलन

By admin | Updated: February 27, 2015 23:18 IST

कामकाजाबद्दल समाधान : शिवाजीनगर ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीची भेट, आता शिवाजीनगर राज्याच्या शर्यतीत

शिवाजी गोरे-दापोली -शासनाने पर्यावरण समतोल व वनरक्षण करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना २००६ पासून राज्यात लागूकेली ११७९९ गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करुन या योजनेचे काम सुरू झाले. संत तुकाराम महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या या योजनेचे सकारात्मक पडसाद पडायला लागले असून दापोली तालुक्यातील शिवाजीनगर ग्रामपंचायतीने संत तुकाराम वन ग्राम योजनेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गावाला काल राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने भेट दिली असता, या योजनेचे सकारात्मक कामे दिसून आली आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत शिवाजीनगर असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य मूल्यमापन समितीचे अध्यक्ष एस. आर. बाबर, ए. जी. जमदाडे, विभागीय वनाधिकारी मूल्यांकन एस. जी. लडखत, उपसंचालक सामाजिक वनीकरण, तुकाराम साळुंखे मुख्य वनसंरक्षक कार्य आयोजन पुणे या कमिटीने शिवाजीनगर गावाला भेट दिली असून, शिवाजीनगर ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची पाहणी केली. गावाने लोक सहभागामुळे श्रमदान केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत शिवाजीनगरचे काम उत्कष्ट असल्याचे मूल्यमापन समितीच्या निदर्शनास आले असून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर शिवाजीनगर ग्रामपंचायत आता राज्यस्तरीय बक्षीस घेण्यासाठी सज्ज झाली आहे.शिवाजीनगर ग्रामपंचायतीच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वनामध्ये अवैध चराई प्रतिबंध वन्य पशु पक्षी संरक्षण, वन्य प्राणी-पक्षी यांना पाणवठा, श्रमदान, लोकसहभाग, इंधनाचा वापर आदी अटी पूर्ण केल्या आहेत.वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पत्की यांचे मार्गदर्शनाखाली संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे आनंदा हिरडीकर वनपाल अनिल दळवी, वनरक्षक, वन व्यवस्थापन अध्यक्ष संजय महाडिक, चंद्रकांत सावंत, अशोक पवार सरपंच, राजेंद्र भोळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर माने, दीपक कुंबेरे, राजेंद्र पवार, चंद्रकांत राणे, रमेश पंदेरे यांनी काम केले.‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून वने व वन्यजीव यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संत तुकाराम वनग्राम योजना शासनाने सुरु केली असून, या योजनेंतर्गत ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या भाग घेतील त्यामधून जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ठरणाऱ्या ३ समित्यांना अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरे बक्षीस दिले जाते. जिल्हास्तरावरील बक्षीसपात्र वनव्यवस्थापन समितीतून राज्यासाठी मूल्यमापन केले जाते. राज्यस्तरावरील ३ उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट राज्यस्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येतो. प्रथम १० लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते.बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून शिवाजीनगर गावाने गावातील विहिरीला बंदिस्त जाळी बसवून बिबट्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.