शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

व्यापार क्षेत्र समृद्ध बनवू !

By admin | Updated: February 1, 2016 00:54 IST

दीपक केसरकर : मालवण येथे २८ वा एकता व्यापारी मेळावा

मालवण : कोकण हा श्रीमंत प्रदेश आहे. मात्र, येथील माणसे गरीबच राहिली आहेत. कोकणच्या समृद्ध भूमीत विकासाची जागृती होणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या माध्यमातून व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी व्यापाऱ्यांनी विकासाच्या दृष्टीने चळवळ उभी केली पाहिजे. आम्ही सत्तेच्या माध्यमातून व्यापार क्षेत्र समृद्ध बनवू, अशी ग्वाही ग्रामविकास आणि वित्तमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मालवण व्यापारी संघाच्यावतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा २८वा एकता व्यापारी मेळावा येथील टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर झाला. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरोसकर, शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, सारस्वत बँक उपाध्यक्ष गौतम ठाकूर, आमदार वैभव नाईक, अलीग्रो टेक्नोलॉजीचे व्यवस्थापक प्रशांत कामत, रवी तळाशीलकर, महेश नार्वेकर, नितीन तायशेटे, नितीन वाळके यांच्यासह सर्व तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी) व्यापाराची व्याप्ती वाढली पाहिजे व्यापार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात व्यापाराला पोषक वातावरण असून, येथील युवा व्यापारी वर्ग सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सामना करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी केले.