शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची वाट मोकळी करा

By admin | Updated: December 11, 2014 00:03 IST

फेरफटका--

कोकणातील माणूस एकतर गावातील टपरीवर भेटेल, नाहीतर कोर्टाच्या आवारात. गावातील दोन गुंठे जमिनीच्या हक्कासाठी दोन पिढ्या केससाठी लढताना पाहायला मिळतात. आपल्या न्याय-हक्कासाठी कितीही रक्कम खर्च करायला तो तयार असतो. ‘बघल्यात मा, तेका कसो दणको दिलय?’ हे सांगताना आपण फार मोठी मर्दुमकी केल्याचा आविर्भाव त्याच्या वागण्यात दिसून येतो. एरव्ही गावाच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होणारा कोकणी माणूस मात्र शेत रस्त्यासाठी आपली दोन फूट जागा देण्यास तयार नसतो. सुरुवातीला तहसीलदार ते कलेक्टर आणि पुढे मुख्य सचिवांपासून मुख्यमंत्री आणि प्रसंगी लोकायुक्तांपर्यंत दोन फूट जागेच्या न्याय-हक्कासाठी तो अर्ज करताना दिसतो. देशातील सत्तर टक्के लोकांचे भरण पोषण करणारा शेती हा एकमेव व्यवसाय आहे. औद्योगिक क्रांतीबरोबर कृषिक्रांती झाली, तरच देशाची प्रगती होऊ शकते. यामुळे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण ही बाब अपरिहार्य झाली आहे; परंतु ही यंत्रसामग्री शेतापर्यंत पोहोचविणे यासाठी बारमाही रस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी पाणंद रस्ते, शीव रस्ते आणि शेत रस्ते मोकळे होणे गरजेचे आह, अशा कामात प्रशासनाला साथ मिळाली, तरच जिल्ह्यात क्रांती घडू शकते, हे मी अनेकवेळा वाचले. मुख्यमंत्र्यांचा माहिती अधिकारी असताना अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची माहिती आमच्या सचिवालयाकडे येत असे. जिल्ह्याच्या निर्मितीच्याच वेळी राज्यात जालना जिल्ह्याची निर्मिती झाली; पण त्यावेळचे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी लोकसहभागातून अक्षरश: क्रांती घडविली. शेत रस्ता आणि पाणंद रस्त्याच्या कामात जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अतिक्रमित आणि बंद झालेल्या पाणंद आणि शीव रस्त्यांची एकूण संख्या ३०६६ एवढी होती. हे काम तसे सोपे नव्हते. जिल्हाधिकारी मुंढे यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सर्व प्रकारच्या शेत रस्त्यांची नोंद गाव नकाशावर घेतली आणि हे नकाशे गावातील इमारतींवर दर्शनी भागांवर लटकाविले. यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:हून ९१६ शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली. तर २४५ रस्त्यांवरील अतिक्रमणे कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन जिल्हा प्रशासनाने काढली. हे काम करण्यासाठी सुमारे ५ कोटी ९५ लाख खर्च आला असता; परंतु हे काम लोकसहभागातून झाल्याने हा खर्च वाचला. याचा जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार लोकांना फायदा झाला. यामुळे यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळाले. शेतमालाच्या किंमती वाढण्यास प्रोत्साहन मिळाले. शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या घरात पैसा खेळू लागला. शेत रस्त्याअभावी होणारे सामाजिक तंटे कमी होण्यास मदत झाली. कोर्ट-कचेरीवर होणारा खर्च वाचला. खरं तर गावातील शेत रस्ते, शीव रस्ते, पाणंद रस्ते खुले करणे हे शेतकऱ्यांचे जीवन उंचविणारे अभियान आहे. शासन स्तरावर महसूल खात्यामार्फत हे अभियान राबविले जाते. कोकणातही असे अतिक्रमित किंवा वादविवादातून बंद झालेले रस्ते आढळतील. गावातील भांडणे ही विकासाच्या आड येता कामा नयेत. पूर्वी गावातील भांडणे ही शेतातील रस्त्यावर किंवा शेताच्या बांधाचा वापर रस्ता म्हणून करण्यावरून होत असत. त्यामुळे ही भांडणे प्रसंगी शेतकऱ्यांचा जीव घेत असत किंवा न्यायालयीन लढाईमुळे शेतकऱ्यांमध्ये कायमस्वरूपी कटुता येत असे. जालना जिल्ह्यातील हा प्रयोग मी स्वत: पाहिला. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा. येणाऱ्या पर्यटकाला आपल्या शेतजमिनीतील वाट मोकळी करून दिली, तर या कोकणात सोने पिकेल. तेवढी क्षमता इथल्या मातीत आहे. प्रश्न हा आहे की, हे पाऊल प्रशासनाने उचलायचे की लोकांनी ? (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)