शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कर्मचारी सव्वाआठ वर्षे गैरहजर...

By admin | Updated: March 31, 2015 21:44 IST

कामचुकारपणा करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मिश्रक म्हणून काम करताना तब्बल ८ वर्षे ३ महिने २३ दिवस गैरहजर राहिलेल्या कोंडउंबरे (ता. संगमेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी निजामुद्दिन एम. पीरजादे याला सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. तसेच सतत गैरहजर राहणारा शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक बाबली बापू चेंदवणकर याला सेवेतून का कमी करू नये, अशी नोटीस बजावल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा व कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक राहावा, यासाठी काळम यांनी मुुख्य कार्यकारी अधिकारीपदावर आल्यापासूनच कणखर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेत कामचुकारपणा करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बाबली बापू चेंदवणकर हा कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होता. मात्र, सतत गैरहजर राहात असल्याने त्याला मूळ वेतनावर आणून शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे सेवेतून निलंबित का करू नये, अशी नोटीस या कर्मचाऱ्याला बजावण्यात आली आहे. या नोटीसीला त्या कर्मचाऱ्याने दहा दिवसांत उत्तर द्यावे, असेही बजावले आहे. दुसऱ्या प्रकरणात गैरहजर राहण्याचा कळसच झाला आहे. निजामुद्दीन पीरजादे हा १९८५ सालापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मिश्रक म्हणून सेवेत होता. त्याला संगमेश्वर तालुक्यातील कोंडउंबरे प्राथमिक आरोग्यकेंद्रात नियुक्त करण्यात आले होते. मात्र, तो ७ जुलै २००४ पासून अनधिकृतरित्या गैरहजर राहिला. त्यामुळे तब्बल ८ वर्षे ३ महिने व २३ दिवस अशी त्याची गैरहजेरी लागली आहे. यादरम्यान त्याने आपण मनोरुग्ण असल्याचा दाखला जिल्हा परिषदेत सादर केला होता. नियमानुसार असा दाखला आल्यानंतर त्याबाबत तपासणीसाठी त्याला सांगली येथील केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या केंद्रातून तपासणीचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या अहवालात संबंधित कर्मचाऱ्याने मनोरुग्ण असल्याचा खोटा दाखला सादर केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा कर्मचारी खोटे बोलत असल्याचे पुढे आले. या कर्मचाऱ्याला सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काळम यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २८ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र उगारल्याने कामचुकारपणा करणाऱ्यांना जोरदार धक्का बसल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)