शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कर्मचारी सव्वाआठ वर्षे गैरहजर...

By admin | Updated: March 31, 2015 21:44 IST

कामचुकारपणा करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मिश्रक म्हणून काम करताना तब्बल ८ वर्षे ३ महिने २३ दिवस गैरहजर राहिलेल्या कोंडउंबरे (ता. संगमेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी निजामुद्दिन एम. पीरजादे याला सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. तसेच सतत गैरहजर राहणारा शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक बाबली बापू चेंदवणकर याला सेवेतून का कमी करू नये, अशी नोटीस बजावल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा व कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक राहावा, यासाठी काळम यांनी मुुख्य कार्यकारी अधिकारीपदावर आल्यापासूनच कणखर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेत कामचुकारपणा करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बाबली बापू चेंदवणकर हा कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होता. मात्र, सतत गैरहजर राहात असल्याने त्याला मूळ वेतनावर आणून शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे सेवेतून निलंबित का करू नये, अशी नोटीस या कर्मचाऱ्याला बजावण्यात आली आहे. या नोटीसीला त्या कर्मचाऱ्याने दहा दिवसांत उत्तर द्यावे, असेही बजावले आहे. दुसऱ्या प्रकरणात गैरहजर राहण्याचा कळसच झाला आहे. निजामुद्दीन पीरजादे हा १९८५ सालापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मिश्रक म्हणून सेवेत होता. त्याला संगमेश्वर तालुक्यातील कोंडउंबरे प्राथमिक आरोग्यकेंद्रात नियुक्त करण्यात आले होते. मात्र, तो ७ जुलै २००४ पासून अनधिकृतरित्या गैरहजर राहिला. त्यामुळे तब्बल ८ वर्षे ३ महिने व २३ दिवस अशी त्याची गैरहजेरी लागली आहे. यादरम्यान त्याने आपण मनोरुग्ण असल्याचा दाखला जिल्हा परिषदेत सादर केला होता. नियमानुसार असा दाखला आल्यानंतर त्याबाबत तपासणीसाठी त्याला सांगली येथील केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या केंद्रातून तपासणीचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या अहवालात संबंधित कर्मचाऱ्याने मनोरुग्ण असल्याचा खोटा दाखला सादर केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा कर्मचारी खोटे बोलत असल्याचे पुढे आले. या कर्मचाऱ्याला सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काळम यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २८ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र उगारल्याने कामचुकारपणा करणाऱ्यांना जोरदार धक्का बसल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)