शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली, शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयाने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:18 IST

यावर्षीची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत आली होती. मात्र, आता शिक्षण उपसंचालकांनी ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ठळक मुद्देअकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकललीशिक्षण उपसंचालकांच्या निर्णयाने समाधान

तळेरे : यावर्षीची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत आली होती. मात्र, आता शिक्षण उपसंचालकांनी ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत शाळा, संस्था, शिक्षक, विद्यार्थी व पालकांतून नाराजीचा सूर निघत होता. शिक्षक भारती सिंधुदुर्ग व शिक्षक भारती रत्नागिरी यांनी या तारखांवर आक्षेप घेत दोन जिल्ह्यांतील गणेशोत्सव काळामधील तारखा बदलण्याची लेखी विनंती शिक्षण उपसंचालक कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती.दोन्ही जिल्ह्यातील संघटनांनी जाहीर वेळापत्रकाचा पाठपुरावा करून या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्या होत्या. सकारात्मक दखल घेऊन शिक्षण उपसंचालकांनी पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करीत वेळापत्रकातील गणेशोत्सव काळ वगळून नवीन वेळापत्रक १२ रोजी फक्त सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुन्हा नव्याने जाहीर केले आहे.

या दोन जिल्ह्यांत १८ सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. शिक्षक भारती सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयsindhudurgसिंधुदुर्गEducation Sectorशिक्षण क्षेत्र