शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

एकनाथ शिंदे निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग प्रस्ताव कसा देतील, दीपक केसरकरांचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर 

By अनंत खं.जाधव | Updated: October 1, 2022 16:43 IST

Deepak Kesarkar: त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते.त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत  असा अंदाज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

- अनंत जाधवसावंतवाडी - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 2014 साली सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव घेऊन आले होते अशी केलेली टीका चुकीची आहे. त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते.त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत  असा अंदाज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते. मंत्री केसरकर म्हणाले,कोल्हापूर सारख्या एका शाहूनगरी चा मला पालकमंत्री करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो कोल्हापूर चा पर्यटन दृष्ट्या विकास करणारच पण उद्योग व्यवसायातही कोल्हापूर अग्रेसर राहिल यांची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिंदे गटाचा दसरा मेळावा हा न भुतो ना भविष्याती असाच होणार आहे. शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत त्यामुळेच मोठ्याप्रमाणात शिवसैनिक दसरा मेळाव्यात सहभागी होतील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही हजारो शिवसैनिक मुंबई ला येणार असून त्याचे नियोजन ही योग्य प्रकारे सुरू आहे असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टिकेला ही मंत्री केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले 2014 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत निर्णय प्रकियेत नव्हते मग ते प्रस्ताव कसा काय घेऊन येतील आणि कामानिमित्त कोण ही कोणाला भेटू शकत नाही का असा सवाल करत प्रस्ताव देण्याचे काम शिंदे यांनी केले तर तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश असेल आणि नंतर त्यांनीच काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली हे ही सर्वानी पाहिली असे मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेAshok Chavanअशोक चव्हाण