शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आठ बंडखोरांची सेनेतून हकालपट्टी

By admin | Updated: February 16, 2017 23:30 IST

राजापुरात सात; रत्नागिरीत एकाचा समावेश

राजापूर/रत्नागिरी : शिवसेनेची पक्षशिस्त मोडून पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या राजापुरातील सात, तर रत्नागिरीतील एका पदाधिकाऱ्याला तत्काळ बाहेरचा मार्ग दाखवून शिवसेनेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.शिवसेनेतील बंडखोरी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही शमली नाही. त्यानंतरही सेनेच्या विरोधात बंडखोरांनी काम सुरू ठेवल्याने रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेचे गोळप उपविभागप्रमुख राकेश साळवी यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी एका पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.राजापूर तालुक्यातही शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये ओणी गटातून माजी तालुका संपर्कप्रमुख संतोष पावसकर, पाचल गटातून पूर्वा पाथरे, कोदवली गणातून अभिजित गुरव यांनी पक्षाला थेट आव्हान देत आपले अर्ज सादर करीत ते कायम ठेवल्याने शिवसेनेपुढील अडचणीत वाढ झाली आहे. त्यातूनच सेनेतील नाराजीचे उघड दर्शन झाले होते.पक्षालाच थेट आव्हान देणाऱ्या बंडखोरांसमवेत त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी थेट मातोश्रीवर गेल्या व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘त्या’ बंडखोरीची दखल घेऊन सात बंडखोरांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामध्ये ओणीतून बंडखोरी करणारे माजी संपर्कप्रमुख संतोष पावसकर, पाचलच्या बंडखोर उमेदवार पूर्वा पाथरे यांचे पती व पाचलचे शाखाप्रमुख प्रसाद पाथरे, पाचलचे आणखी एक शाखाप्रमुख सुरेश ऐनारकर, तळवडेचे शाखाप्रमुख संदीप बारस्कर, नेरकेवाडीचे दिलीप पवार, पाचलच्या महिला विभाग संघटक शशिकला देवरुखकर, कोदवली गणाचे उमेदवार अभिजित गुरव यांचा समावेश आहे.गुरुवारी राजापूर दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवरील कारवाईबाबतचा निर्णय सांगण्यात आला. त्यानुसार शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी पक्षप्रमुखांच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाचल शाखाप्रमुखपदी हेमंत सीताराम नारकर, पाचलचे आणखी एका शाखाप्रमुख प्रकाश धुळप, तळवडे शाखाप्रमुखपदी सुरेश गुडेकर, नेरकेवाडी रमेश शिवगण व पाचल महिला संघटकपदी अंजली कडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणादेखील तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केली आहे.अखेर शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या मंडळींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याचे आता कसे पडसाद उमटतात याकडे तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)