शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

सत्ताधारी सरकारकडून कामगारांचे आर्थिक शोषण

By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST

गुरुदास दासगुप्ता : कुडाळ येथील महाअधिवेशनाच्या सांगता समारंभात टीका

कुडाळ : सध्याच्या सरकारने हा देश भांडवलशाही परदेशी गुंतवणूकदारांच्या हाती देण्याचे ठरविले असून कामगार कायद्यात बदल करून येथील कामगार, शेतकऱ्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने भविष्यकाळ अंधारमय होण्याची चिन्हे आहेत. या सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात पेटून उठून देशव्यापी आंदोलन छेडूया, असे आवाहन आॅल इंडिया ग्रेड युनियनचे काँग्रेसचे सरचिटणीस कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता यांनी केले.ते कुडाळ येथील महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फाऊंडेशनने महाअधिवेशनाच्या सांगता समारंभात बोलत होते. महाअधिवेशनाचा सांगता सोहळा रविवारी सकाळी झाला. यावेळी आॅल इंडिया फेडरेशन आॅफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे सरचिटणीस कॉ. चक्रधरप्रसाद सिंग (पाटणा बिहार), फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा, प्रभारी सरचिटणीस सी. एन. देशमुख, एम. के. चौरे, अनिला झोके, राज्य उपाध्यक्ष प्रदीप नेरूरकर, भाऊ पाटील, कृष्णा भोयर, दिलीप साळुंखे, डी. के. पात्रे, माधव लोकरे, मनोहर आचारे, सुहास वर्धम, संजय वरवडेकर, आलेखा शारबिद्रे, चंद्रभाऊ दिलीप पवार, ज्योती नटराजन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजप सरकारवर हल्लाबोलयावेळी दासगुप्ता यांनी भाजप सरकारने कामगार शेतकरी विरोधी अवलंबिलेल्या धोरणाबात सरकारवर हल्लाबोल चढविला. दासगुप्ता म्हणाले, देशात ८० टक्के शेतकरी जनता असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु सरकार भांडवलशाही जनतेसोबत आहे. सरकार शेतकरी तसेच लहान व्यापाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे धोरण अवलंबित आहे. सरकारमुळे औद्योगिक उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. एकाच ठिकाणी थांबलेल्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार योग्य ती पावले उचलत नाही. विकासाच्या योजना बंद करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. प्रत्येक विभाग क्षेत्र खासगीकरणाकडे न्यायचा सरकारचा प्रयत्न आहे. १८ कामगार कायद्यात बदल करून कामगारांविरोधात कायदे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी, मजूर, कामगार यांचे आर्थिक शोषण करण्याचा कुटील डाव सरकार बनवित आहे. असे अनेक आरोप सध्याच्या भाजपा सरकारवर दासगुप्ता यांनी या अधिवेशनात करून भाजपा सरकावर हल्लाबोल केला. वर्कर्स फेडरेशनतर्फे कुडाळ शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात कुडाळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. (प्रतिनिधी)