शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'ते' धोरण मुंबईत बसून ठरवता येत नाही, मंत्री केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

By अनंत खं.जाधव | Updated: August 29, 2022 22:42 IST

राज्यात शालेय पुस्तकाबरोबर वह्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुस्तकावर पेजेस वाढवून त्याचे रूपांतर वहीत करण्यात येणार आहे.

सावंतवाडी : इकोसेन्सेटिव्ह बाबत शासन पुनर्विचार करणार असून तशी घोषणा वनमंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत केली आहे. कोणताही विचारविनिमय न करता मुंबईत बसून कोणतेही धोरण ठरवता येत नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. शिंदे सरकार रोजगार हिरवणारे निर्णय घेणार नाही, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला. ते सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बबन राणे, अनारोजीन लोबो, राजन पोकळे आदि उपस्थित होते.

राज्यात शालेय पुस्तकाबरोबर वह्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुस्तकावर पेजेस वाढवून त्याचे रूपांतर वहीत करण्यात येणार आहे. जेणेकरून गरीब मुलांची वह्यांची समस्या दूर होऊ शकते हा यामागचा उद्येश आहे. परंतु या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नसून आम्ही हे करू शकलो तर महाराष्ट्रात नवी क्रांती घडेल. तसेच मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एक पुस्तक तीन टप्प्यात देण्याच्या दृष्टीने आमचा विचार असल्याचेही केसरकर म्हणाले.

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न आहे त्यासाठी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देऊन त्यांच्याकडील सर्वोत्तम घेऊन महाराष्ट्र राज्य भारतात पहिलं आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असे ही केसरकर म्हणाले. सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण बांधील आहे रत्नसिंधू व चांदा ते बांदा या योजने संदर्भातही आपण दोन टप्प्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहे तर उद्या अकरा वाजता आपल्या कार्यालयात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण करायची आढावा बैठक होणार आहे विद्यार्थी हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यांना सर्वोत्तम दिल्यानंतरच शिक्षकांच्या समस्या बाबत विचार करण्यात येणार आहे असे ही केसरकर यांनी सांगितले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला

इकोसेन्सेटिव्ह बाबत शासन पुनर्विचार करणार असून तशी घोषणा विधीमंडळात झाली आहे. मुंबईत बसून एखादे धोरण ठरवणे योग्य नाही असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावत  रोजगारावर काय परिणाम होणार हे पण बघितले पाहिजे पूर्वी कोणताही निर्णय घेतना सरपंचा पासून सर्वाना विचारात घेतले जात होते.पण या निर्णयावेळी तसे झाले नाही असे झाले नसल्याचे केसरकर म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर