शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

कालव्याला भगदाडाचे ग्रहण

By admin | Updated: February 5, 2016 23:56 IST

तिलारीत कोट्यवधीचा निधी : आभाळंच फाटलंय, ठिगळं लावणार तरी कुठे ?

वैभव साळकर -- दोडामार्ग तिलारी प्रकल्पाला गेल्या दोन वर्षापासून कालवा फुटीचे ग्रहण लागले आहे. मागील दोन वर्षात तब्बल सातवेळा कालव्यांना भगदाड पडण्याच्या घटना घडल्या. पाटबंधारे विभागाकडून कोट्यवधीचा निधी कालव्याच्या कामावर खर्ची झाला असतानाही कालवे फुटत आहेत. त्यामुळे हा निधी नेमका झिरपला कोठे, हे शोधून काढणे संशोधनाचा विषय ठरला आहे. गेल्या दोन महिन्यात तर कालव्यांना भगदाड पडण्याच्या सपाटा सुरू आहे. त्यामुळे कालव्यांंची कामे निकृष्ट पद्धतीने झाली असल्याचेच निदर्शनास येत आहे. तर कालव्याची पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी भविष्यात आणखीन भगदाडे पडण्याची शक्यता आहे. परिणामत: आभाळच फाटल्याने ठिगळे तरी कुठे-कुठे लावणार, अशा अवस्थेत कालवा विभागाचे अधिकारी सापडले आहेत. गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्यीय प्रकल्प साकारला आहे. ७४ टक्के वाटा गोव्याचा, तर उर्वरित २६ टक्के वाटा महाराष्ट्राचा असे समीकरण प्रकल्पाबाबत करार करताना दोन्ही राज्य शासनादरम्यान ठरले. जसा खर्चाचा वाटा तसाच पाण्याचादेखील ठरविण्यात आला. प्रकल्पाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी कालव्यांची कामे युद्धपातळीवर करण्यात आली. सन १८८० च्या दरम्यान सुरू झालेले धरणाचे काम सन २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात आले. सुरूवातीला ४८ कोटीपर्यंत अंदाजपत्रक असलेला हा प्रकल्प दीड हजार कोटीवर जाऊन पोहोचला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रूपयांचा निधी प्रकल्पावर खर्ची घालण्यात आला. यातील बराचसा निधी मुख्य धरण व कालव्याच्या कामावर खर्ची घालण्यात आला. गोव्यात पाणी नेण्यासाठी दोन कालवे काढण्यात आले आहेत. मुख्य धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे गोव्यात डिचोली तालुक्यात, तर तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्याचे पाणी पेडणे तालुक्यात सोडण्यात येते. त्यापैकी डाव्या कालव्याची लांबी १८.३७९ किलोमीटर आहे, तर उजव्या कालव्याची लांबी २४.६९२ किलोमीटर आहे. या दोन्ही कालव्यांवर कोट्यवधीचा निधी खर्ची घालण्यात आला. ज्या पद्धतीने पाण्यासारखा निधी खर्ची घालण्यात आला, त्या अनुषंगाने कालव्याची कामे सुद्धा दर्जेदार होणे अपेक्षित होते. परंतु कालव्यातून पाणी सोडून १२ ते १५ वर्षे होतात तोच कालवे ढासळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. गेल्या दोन वर्षात कालव्याला भगदाड पडणे, फुटणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे खरोखरच कालव्यांची कामे दर्जेदार झाली आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात तब्बल सातवेळा कालवे फुटले आहेत. काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे निकृष्ट कामाचे नमुने चव्हाट्यावर आले आहेत. पाटबंधारे विभाग कोट्यवधी रूपयांचा निधी खर्ची घालतो. मग हा निधी जातो तरी कोठे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. दोन वर्षापूर्वी सर्वात प्रथम खानयाळे याठिकाणी डावा कालवा फुटण्याची घटना घडली. त्यानंतर ठराविक काळाने एका पाठोपाठ एक कालव्यांना भगदाडे पडण्याच्या घटना घडत गेल्या. उजव्या कालव्याला तिलारी, घोटगेवाडी याठिकाणी, तर डाव्या कालव्याला खानयाळे ते बोडदे यादरम्यान भगदाडे पडली. उर्वरित कालव्याची पाहणी केली, तर अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी कालवा फुटण्याची किंवा भगदाड पडण्याची शक्यता अधिक आहे. सध्या कालव्याचे गोव्यात जाणारे पाणी बंद आहे. त्यामुळे कालव्यांची झालेली परिस्थिती स्पष्टपणे दिसते. प्लास्टिक कापडावर कालव्यांना सिमेंंट-काँक्रिटच देण्यात आलेला मुलामा केव्हाचाच निखळून पडला आहे. तर अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. त्यामुळे भविष्यात कालव्यांच्या सुरक्षेबाबत सध्यातरी सांगणे कठीण आहे. ज्याठिकाणी भगदाडे पडली आहेत, त्याठिकाणी केवळ तकलादू उपाययोजना करून वेळ मारून नेण्याचा प्रकार कालवा विभागाकडून सुरू आहे.देशभरात कामे रखडली : पंतप्रधान निधीबाबत माहिती देण्याची मागणीदेशभरात रखडलेल्या धरणांची कामे युद्धपातळीवर व्हावीत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तिलारी धरणाला पंतप्रधान निधीतून ३२० कोटी रूपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. आठ दिवसांपूर्वीच राज्याचे पाटबंधारे खात्याचे सचिव तिलारीला भेट देऊन गेले. मात्र, हा निधी कोणत्या कामांवर खर्च होणार, हे जाहीर करावे आणि कालव्यांच्या आतापर्यंतच्या झालेल्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे.