शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

आरामबस चालकांची दादागिरी

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

तक्रार देऊनही उपप्रादेशिक परिवहन गप्प : तिकीट सावंतवाडीचे, उतरवतात झारापला

अनंत जाधव- सावंतवाडी -मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या आरामबस व्यावसायिकांनी सावंतवाडीला ठेंगा दाखवत मुंबई व्हाया झाराप टू गोवा असा मार्ग पत्करल्याने अनेक चाकरमानी भाविकांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत. त्यातच हे आरामबसधारक तिकिट देतात सावंतवाडीचे आणि उतरवतात मात्र झाराप येथे, मग आमचे तिकिट सावंतवाडीपर्यंत का घेतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत वेळोवेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आरामबसधारक बिनधास्त झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी आवाज उठविला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या आरामबस यापूर्वी सावंतवाडीतून जात असत. पण अलिकडे झाराप- पत्रादेवी महामार्ग सुरू झाल्याने आता या महामार्गावरूनच आरामबस वळवल्या जात आहेत. त्या सावंतवाडीकडे पाठ करीत झाराप येथून थेट गोवा गाठतात. अनेक वेळा यावरून वादही झाला आहे. मुंबईतील एका महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. पण पोलिसांना अधिकार नसल्याने त्यांनी ही तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे वर्ग केली. मात्र, त्यांनी अद्यापपर्यत यावर कोणतीही कारवाई केली नाही.आरामबसधारक हे बहुतांशी मुंबई व गोव्यातील आहेत. ते मुंबईतून येताना झाराप मार्गे गोव्याला जातात. परंतु गोव्यातून येताना मात्र तिकिट बुकिंग असल्याने सावंतवाडीतून येतात. मग हा मार्ग त्यांना कसा काय चालतो, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच गणेश चतुर्थीनिमित्त अनेक चाकरमानी कोकणात येत असतात. त्यांना काही आरामबसधारकांनी झाराप, तर काहींनी बांदा येथे उतरविल्याने चाकरमान्यांमधून संताप व्यक्त होत असून अशा आराम बसधारकांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.परिवहन विभाग गप्प का?याबाबत अनेक वेळा रितसर तक्रारी करूनही उपप्रादेशिक परिवहन विभाग गप्प आहे. मुुंबईतून सावंतवाडीचे तिकिट घ्यायचे आणि त्यांना झाराप येथे अर्ध्यावरच उतरवायचे. हा प्रवाशांवर होणारा अन्याय आरटीओ विभागच सोडवणार. मग ते आरामबसधारकांविरोधात लेखी तक्रारी येऊनही गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे.वसंत केसरांकराकडून आंदोलनाचा इशारासावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसे पत्रक त्यांनी जारी केले असून हा सावंतवाडीवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेचाकरमान्यांवरच अन्याय होत नाही, तर अनेकवेळा सावंतवाडीसह अन्य भागातील ग्रामस्थांवरही हे आरामबसधारक अन्याय करीत असल्याचे दिसून येते. राजकारणी लोक स्वत:च्या गाड्यांमधून प्रवास करीत असतात. त्यांना आमच्या समस्या काय समजणार, असा संतापजनक सवाल काही चाकरमानी व्यक्त करीत आहेत. आता विधानसभा निवडणूक येत आहे. त्यांच्याकडून यावर तोडगा काढून घ्यावा. आम्ही झाराप व बांदा येथे उतरून रिक्षांना हजार रुपये मोजायचे का? की एसटीची वाट बघत बसायची, असा सवाल चाकरमानी उपस्थित करीत आहेत.