शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आरामबस चालकांची दादागिरी

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

तक्रार देऊनही उपप्रादेशिक परिवहन गप्प : तिकीट सावंतवाडीचे, उतरवतात झारापला

अनंत जाधव- सावंतवाडी -मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या आरामबस व्यावसायिकांनी सावंतवाडीला ठेंगा दाखवत मुंबई व्हाया झाराप टू गोवा असा मार्ग पत्करल्याने अनेक चाकरमानी भाविकांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत. त्यातच हे आरामबसधारक तिकिट देतात सावंतवाडीचे आणि उतरवतात मात्र झाराप येथे, मग आमचे तिकिट सावंतवाडीपर्यंत का घेतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत वेळोवेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आरामबसधारक बिनधास्त झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी आवाज उठविला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या आरामबस यापूर्वी सावंतवाडीतून जात असत. पण अलिकडे झाराप- पत्रादेवी महामार्ग सुरू झाल्याने आता या महामार्गावरूनच आरामबस वळवल्या जात आहेत. त्या सावंतवाडीकडे पाठ करीत झाराप येथून थेट गोवा गाठतात. अनेक वेळा यावरून वादही झाला आहे. मुंबईतील एका महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. पण पोलिसांना अधिकार नसल्याने त्यांनी ही तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे वर्ग केली. मात्र, त्यांनी अद्यापपर्यत यावर कोणतीही कारवाई केली नाही.आरामबसधारक हे बहुतांशी मुंबई व गोव्यातील आहेत. ते मुंबईतून येताना झाराप मार्गे गोव्याला जातात. परंतु गोव्यातून येताना मात्र तिकिट बुकिंग असल्याने सावंतवाडीतून येतात. मग हा मार्ग त्यांना कसा काय चालतो, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच गणेश चतुर्थीनिमित्त अनेक चाकरमानी कोकणात येत असतात. त्यांना काही आरामबसधारकांनी झाराप, तर काहींनी बांदा येथे उतरविल्याने चाकरमान्यांमधून संताप व्यक्त होत असून अशा आराम बसधारकांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.परिवहन विभाग गप्प का?याबाबत अनेक वेळा रितसर तक्रारी करूनही उपप्रादेशिक परिवहन विभाग गप्प आहे. मुुंबईतून सावंतवाडीचे तिकिट घ्यायचे आणि त्यांना झाराप येथे अर्ध्यावरच उतरवायचे. हा प्रवाशांवर होणारा अन्याय आरटीओ विभागच सोडवणार. मग ते आरामबसधारकांविरोधात लेखी तक्रारी येऊनही गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे.वसंत केसरांकराकडून आंदोलनाचा इशारासावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसे पत्रक त्यांनी जारी केले असून हा सावंतवाडीवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेचाकरमान्यांवरच अन्याय होत नाही, तर अनेकवेळा सावंतवाडीसह अन्य भागातील ग्रामस्थांवरही हे आरामबसधारक अन्याय करीत असल्याचे दिसून येते. राजकारणी लोक स्वत:च्या गाड्यांमधून प्रवास करीत असतात. त्यांना आमच्या समस्या काय समजणार, असा संतापजनक सवाल काही चाकरमानी व्यक्त करीत आहेत. आता विधानसभा निवडणूक येत आहे. त्यांच्याकडून यावर तोडगा काढून घ्यावा. आम्ही झाराप व बांदा येथे उतरून रिक्षांना हजार रुपये मोजायचे का? की एसटीची वाट बघत बसायची, असा सवाल चाकरमानी उपस्थित करीत आहेत.