शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दत्ता सामंत यांनाही विधिमंडळात नेणार!, माजी खासदार निलेश राणेंचा ठाम विश्वास

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 24, 2022 12:25 IST

विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघातून मी आमदार व्हावे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा. लोकांसाठी, समाजासाठी काम करत राहायचे. याच भावनेतून काम करत असताना पक्षाचे आदेश व देवाच्या इच्छेने आमदार झालो तर माझ्या नंतर दत्ता सामंत यांनाही त्याच सन्मानाने विधिमंडळात नेणे हेच माझे प्रयत्न राहतील. असे ठाम मत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण घुमडे येथे बोलताना व्यक्त केले.दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिर येथे आयोजित भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी निलेश राणे व दत्ता सामंत यांची दिलखुलास भाषणे झाली. राजकीय टोलेबाजीही यावेळी रंगली.यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या भजन स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. सामंत यांचे कार्य व कार्यक्रम कधीच फायद्यासाठी नसतात तर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी असतात. तसेच त्यांचे कार्यक्रम आयोजन वेगळ्या उंचीचे व दर्जेदार असतात. ही भजन स्पर्धाही यशस्वी झाली.यालाही मनाचा मोठेपणा लागतोयाठिकाणी दत्ता सामंत यांच्यासह सगळेच माझ्या आमदारकीसाठी सदिच्छा व्यक्त करतात. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा पक्षाचे आदेश असतील. मात्र दत्ता सामंत सारखी माणसे मनाने मोठी आहेत. दुसऱ्याला मोठे करणे, मोठे व्हा हे त्यांचे सांगणे यालाही मनाचा मोठेपणा लागतो. त्यांनी माणसे कमावली. राणे साहेबांसोबत ते निष्ठेने राहिले. राजकारणसाठी त्यांनी काही केले नाही. केवळ समाजकारण केले. जनतेची सेवा हीच राणे साहेबांची शिकवण आहे. त्याच धर्तीवर आम्हीही कार्य करतो. दत्ता सामंत आणि आमच्यात आपुलकीचे नाते आहे. आम्ही सांघिक खेळ खेळतो. मैदानात खेळ खेळायला आम्हाला आवडते. म्हणजेच सर्वांसोबत राहायला आम्हाला आवडते. जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे.कितीही विष कालवलं तरी राणे-सामंत वेगळे होणार नाहीतसर्वांच्या आशिर्वादाने मी आमदार झालो तर विधिमंडळ सभागृहात दत्ता सामंतही असतील हे निश्चित. दत्ता सामंत माझे मोठे भाऊ आहेत आणि हे नाते कायम राहील. मी पक्षाकडे त्यांच्यासाठी शिफारस करणार. विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत. त्यांच्यात दुरावा असणार नाही असेही निलेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Politicsराजकारण