शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अवकाळीचा आंबा, काजूला फटका

By admin | Updated: January 2, 2015 00:16 IST

मोहोर पडतोय गळून : तीन तालुक्यांत पावसाची हजेरी; मळभापाठोपाठ पावसाचा दणका

रत्नागिरी/चिपळूण : गेले काही दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आधीच बागायतदार चिंतेत असताना आज, गुरुवारी पडलेल्या पावसाने त्यात भर घातली आहे. आज रत्नागिरी, संगमेश्वरसह चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा आणि काजूला दुसऱ्या टप्प्यात आलेला बराच मोहोर गळून पडला आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दाट मळभाचे वातावरण असून, त्यामुळे आंबा, काजूचा चांगला आलेला मोहोर खराब होत आहे. गेले १५ दिवस चांगली थंडी पडत असल्याने दुसऱ्या टप्प्याचा मोहोर बहरला आहे. मात्र, सतत मळभ असल्याने तो खराब होऊन त्यावर कीड, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. आॅक्टोबरअखेरीस आलेला पहिल्या टप्प्याचा मोहोर नोव्हेंबर, डिसेंबरच्या अवकाळी पावसामुळे खराब होऊन फुकट गेला होता. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जोरदार थंडी पडण्यास सुरुवात होऊन दुसऱ्या टप्प्यातील मोहोर फुटण्यास पोषक वातावरण निर्माण झाले. त्यानुसार चांगला मोहोर आलाही. मात्र, आता त्यालाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे तो खराब होण्याची शक्यता असल्याचे करंजारी येथील आंबा बागायतदार राजेश हेगिष्टे यांनी सांगितले.रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरातील चरवेली, कापडगाव, नागलेवाडी, साठरेबांबर, खानू, कशेळी, नाणीज, मठ, चोरवणे, करंजारी, तसेच संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे, बुरंबी, मुचरी या परिसरात आज पाऊस पडला.चिपळूण तालुक्याच्या काही भागातही आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. गेले दोन ते तीन दिवस कडाक्याची थंडी पडत आहे. त्यातच हवामान ढगाळ होते. आज दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झाले नव्हते. रामपूर परिसरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रामपूर, गुढे, उमरोली, पाथर्डी, मिरवणे, मार्गताम्हाणे या भागात पावसाने हजेरी लावली. हवामान ढगाळ असले तरी चिपळूण शहरात मात्र पावसाचा एकही थेंब पडला नाही. (प्रतिनिधी)