शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

रत्नागिरीत दुमदुमतोय शिमगोत्सव

By admin | Updated: March 11, 2017 00:01 IST

ढोल - ताशांचा गजर : भद्रे शिमगोत्सव उद्या; गावोगावी नाचणाऱ्या पालख्यांमुळे उत्साह

रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. काही गावांमधून तेरसे शिमग्याला प्रारंभ झाला आहे. तर भद्रे शिमगे रविवारपासून साजरे करण्यात येणार आहेत. शहराच्या आसपासच्या गावांतील पालख्या बारावाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरीला भेटावयास येत असल्यामुळे शहरात ढोल-ताशांच्या गजर ऐकावयास मिळत असून, पालख्यांमुळे शिमगोत्सवाचे उत्साही वातावरण तयार झाले आहे. फाकपंचमीनंतर ग्रामदेवतांना रूपे लावली जातात. त्यानंतर पालख्या बाहेर पडतात. या पालख्या शहरात श्री भैरीबुवाच्या भेटीला येतात. त्यानंतर त्या आपापल्या गावी शिमगोत्सवासाठी परततात. जवळपासच्या गावातील अनेक पालख्या पायी तर काही पालख्या टेम्पो अथवा ट्रकमधून येतात. जयस्तंभपासून पालख्या मंदिरापर्यंत पायी नेल्या जात असल्याने सध्या शहरात वाहतुकीची कोंडीदेखील होत आहे. दि. १२ मार्चपर्यंत शहरात विविध पालख्या येणार असल्यामुळे श्री भैरी देवस्थानतर्फे त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.गावोगावी साजरा होणारा शिमगोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)बच्चे कंपनीच्या पालख्याशिमगोत्सवामुळे बच्चेकंपनी देखील छोट्या पालख्या परिसरातील घरोघरी घेऊन जात आहेत. पुठ्ठ्याच्या पालख्यांमध्ये देवीचा फोटो ठेवून ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढत आहेत. सध्या परीक्षांचा हंगाम असला, तरी सुटीच्या दिवसात पालख्या नाचविण्यात येत आहेत.नमन व बहुरूपीशिमगोत्सवात गावोगावी नमन अथवा खेळे, संकासूर घरोघरी येत आहेत. काही मिनिटांचा खेळ सादर करून ओवाळणी गोळा केली जाते. शिमगोत्सवात बहुरूपीदेखील पोलिसांच्या वेशभूषेत येऊन बिदागी गोळा करीत आहेत. शिमगोत्सवासाठी मुंबईकरांचे आगमनतेरसे शिमगोत्सवास सुरूवात झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थायिक असलेली मंडळी गावी परतली आहेत. ग्रामदेवतेची पालखी घरी येत असल्यामुळे महिलंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देवीची पूजा, ओटी भरण्यासाठी महिला गावी आल्या आहेत. दुसरा शनिवार, रविवार व होळीची जोडून सुटी आल्याने अनेक मंडळी आणखी रजा घेऊन गावी आली आहेत. काही गावांमधून शिमगोत्सवानंतर सार्वजनिक पूजा, उत्सव साजरे करण्यात येत असल्याने सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या काळामुळे विद्यार्थी मात्र हिरमुसले आहेत.