शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

अनामतच्या कमिशनवर डल्ला

By admin | Updated: October 6, 2015 23:42 IST

तिलारी प्रकल्पातील प्रकार : ठेकेदार धास्तावले, पाटबंधारे मंत्र्यांकडे तक्रार

सावंतवाडी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पाची सर्व कामे गेली दोन वर्षे ठप्प असल्याने तसेच शासनाने निधीच न दिल्याने ठेकेदारांनी आपली अनामत रक्कमच काढून घेण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र, या अनामत रकमेच्या कमिशनसाठी अधिकारी तगादा लावत थेट डल्ला मारत असल्याने ठेकेदाराची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. याबाबत काही ठेकेदारांनी थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे.तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद आहेत. शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे आहे. मात्र, यातील शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले असून, उर्वरित रक्कम अद्यापपर्यंत दिलेली नाही. अनेकवेळा ठेकेदार संघटनांनी पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दाद मागितली. पण अद्यापपर्यंत पैसे देण्यात आलेले नाहीत. तिलारी हा आंतरराज्य प्रकल्प असल्याने महाराष्ट्र सरकार गोव्याकडे बोट दाखवत असून, गोवा सरकार महाराष्ट्रकडे बोट दाखवत आहे. गोव्याकडून महाराष्ट्र सरकारला ५४ कोटी रूपये येणे असून, तेही पैसे अद्यापपर्यंत दिले गेलेले नाहीत.शासनाकडून केलेल्या कामांचे पैसे मिळत नसतील, तर आमची अनामत रक्कम परत द्या, असे म्हणत १५ ठेकेदारांनी आपली अनामत रक्कम कालवा विभागातून काढून घेतली. तब्बल २५ ते ३० लाखांची ही रक्कम आहे. मात्र, ही रक्कम घेणाऱ्या ठेकेदारांना वेगळ््याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या अनामत रक्कमेवरही अधिकाऱ्याने कमिशनचा डल्ला मारल्याने अनेक ठेकेदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. अन्य ठेकेदारांनी अनामत रक्कमेसाठी अर्ज केला आहे.कारण ही अनामत रक्कम प्रत्येक ठेकेदाराला काम घेण्यापूर्वी कार्यालयाला जमा करावयाची असते आणि काम संपल्यावर ती काढून घ्यायची असते. याच रक्कमेच्या कमिशनवर अधिकाऱ्याने डल्ला मारण्यास सुरूवात केल्याने ठेकेदारांनी याबाबत थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातच तिलारी धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालवा विभागाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. पूर्वीचे पैसे द्या अन्यथा पुढील कामे करणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतल्याने तिलारी प्रकल्प सध्या ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)मंत्री, अधिकाऱ्यांना ठेकेदार भेटतातयाबाबत तिलारी प्रकल्पाचे ठेकेदार राजन म्हापसेकर यांना विचारले असता ते म्हणाले, ठेकेदार हे नेहमीच अधिकारी व मंत्री यांना भेटत असतात. त्यामुळे कोणी तक्रार केली याची मला माहिती नाही. मात्र, असा प्रकार घडला असेल तर तक्रार केल्याचेही नाकारता येत नाही, असे म्हापसेकर यांनी स्पष्ट केले.तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद.शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे.शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले.महाराष्ट्र सरकार दाखवतेय गोव्याकडे बोट.अनेक ठेकेदार झाले आहेत हवालदिल.