शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

अनामतच्या कमिशनवर डल्ला

By admin | Updated: October 6, 2015 23:42 IST

तिलारी प्रकल्पातील प्रकार : ठेकेदार धास्तावले, पाटबंधारे मंत्र्यांकडे तक्रार

सावंतवाडी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पाची सर्व कामे गेली दोन वर्षे ठप्प असल्याने तसेच शासनाने निधीच न दिल्याने ठेकेदारांनी आपली अनामत रक्कमच काढून घेण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र, या अनामत रकमेच्या कमिशनसाठी अधिकारी तगादा लावत थेट डल्ला मारत असल्याने ठेकेदाराची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. याबाबत काही ठेकेदारांनी थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे.तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद आहेत. शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे आहे. मात्र, यातील शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले असून, उर्वरित रक्कम अद्यापपर्यंत दिलेली नाही. अनेकवेळा ठेकेदार संघटनांनी पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दाद मागितली. पण अद्यापपर्यंत पैसे देण्यात आलेले नाहीत. तिलारी हा आंतरराज्य प्रकल्प असल्याने महाराष्ट्र सरकार गोव्याकडे बोट दाखवत असून, गोवा सरकार महाराष्ट्रकडे बोट दाखवत आहे. गोव्याकडून महाराष्ट्र सरकारला ५४ कोटी रूपये येणे असून, तेही पैसे अद्यापपर्यंत दिले गेलेले नाहीत.शासनाकडून केलेल्या कामांचे पैसे मिळत नसतील, तर आमची अनामत रक्कम परत द्या, असे म्हणत १५ ठेकेदारांनी आपली अनामत रक्कम कालवा विभागातून काढून घेतली. तब्बल २५ ते ३० लाखांची ही रक्कम आहे. मात्र, ही रक्कम घेणाऱ्या ठेकेदारांना वेगळ््याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या अनामत रक्कमेवरही अधिकाऱ्याने कमिशनचा डल्ला मारल्याने अनेक ठेकेदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. अन्य ठेकेदारांनी अनामत रक्कमेसाठी अर्ज केला आहे.कारण ही अनामत रक्कम प्रत्येक ठेकेदाराला काम घेण्यापूर्वी कार्यालयाला जमा करावयाची असते आणि काम संपल्यावर ती काढून घ्यायची असते. याच रक्कमेच्या कमिशनवर अधिकाऱ्याने डल्ला मारण्यास सुरूवात केल्याने ठेकेदारांनी याबाबत थेट पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातच तिलारी धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालवा विभागाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. पूर्वीचे पैसे द्या अन्यथा पुढील कामे करणार नाही, असा पवित्रा ठेकेदारांनी घेतल्याने तिलारी प्रकल्प सध्या ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)मंत्री, अधिकाऱ्यांना ठेकेदार भेटतातयाबाबत तिलारी प्रकल्पाचे ठेकेदार राजन म्हापसेकर यांना विचारले असता ते म्हणाले, ठेकेदार हे नेहमीच अधिकारी व मंत्री यांना भेटत असतात. त्यामुळे कोणी तक्रार केली याची मला माहिती नाही. मात्र, असा प्रकार घडला असेल तर तक्रार केल्याचेही नाकारता येत नाही, असे म्हापसेकर यांनी स्पष्ट केले.तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाची कामे गेली दोन वर्षे बंद.शासनाकडून ठेकेदारांना कामाचे तब्बल १२ कोटी रूपये येणे.शासनाने फक्त ४३ लाख रूपये दिले.महाराष्ट्र सरकार दाखवतेय गोव्याकडे बोट.अनेक ठेकेदार झाले आहेत हवालदिल.