शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

स्थानिकांच्या रोषामुळेच आरोग्य यंत्रणा कोलमडली प्रमोद जठार : अधिकार्‍यांना चांगली वागणूक मिळणे गरजेचे

By admin | Updated: May 11, 2014 00:01 IST

सावंतवाडी : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांना स्थानिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.

सावंतवाडी : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांना स्थानिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात वैद्यकीय अधिकार्‍यांना चांगली वागणूक मिळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. सिंधुदुर्गात वैद्यकीय अधिकारी कायमस्वरुपी नाहीत. मात्र, शिपाई कायमस्वरुपी असतात असे सांगत जठार यांनी डॉक्टर आल्यावर त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि ते चार महिन्यातच जिल्ह्याबाहेर जातात. सध्या जिल्ह्यात चार चांगल्या डॉक्टरांवरच्या जीवावरच सहा ग्रामीण रुग्णालये व दोन जिल्हा रुग्णालये सुरू आहेत. तसेच श्रीलंकेकडून देवगडमध्ये आलेल्या चांगल्या डॉक्टरांची मालवणच्या रुग्णालयांमध्ये बदली करुन पळवापळवीची कामे करण्यात येत आहेत, असे आमदार जठार यांनी सांगितले. एक परिपूर्ण वैद्यकीय अधिकारी तयार व्हायला ३५ वर्षे लागतात. मात्र, त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. तसेच त्यांना मारहाणही केली जाते. सध्या वैद्यकीय अधिकार्‍यांना ५० हजार ते १ लाखापर्यंत पगार दिला जातो. असे डॉक्टरही येथील स्थानिकांच्या रोषामुळे चार ते पाच महिनेच राहतात. भाजपाचे सरकार आल्यास जिल्ह्यात चांगले डॉक्टर उपलब्ध करून त्यांना दुप्पट मानधन दिले जाईल, असे सांगितले. यामुळे शहरात वाढत चाललेल्या खासगी रुग्णालये थांबून सरकारी आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची भरती केली जाईल. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे शासनाने का भरली नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गडचिरोली व सिंधुदुर्गात डॉक्टर यायला बघत नाहीत. यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानेच डॉक्टरांची काळजी घेतली पाहिजे, असे आमदार जठार यांनी सांगितले. (वार्ताहर)