शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शासनाच्या उदासीनतेमुळे आंबोली पर्यटन विकासाला खिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:26 IST

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या बैठकीत नाराजी ठोस पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा

आंबोली : शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आंबोली पर्यटन स्थळाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी विविध विकासकामांवर खर्च करत असलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला आहे.

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.जिल्ह्यातील प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये शासनाने विकासात्मक धोरणे राबवून आंबोली पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्द झाले. तेच पर्यटन क्षेत्र आज भकास होण्याची चिन्हे दिसत आहे.

या पर्यटन क्षेत्राचा विकास न होण्याचे कारण फक्त लोकप्रतिनिधी आणि शासन असल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यटनासाठी आलेला लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही आंबोली पर्यटन स्थळाची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे हा निधी जातो तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आंबोली पर्यटन झपाट्याने वाढ होण्याचे राहिले बाजूला, पण पर्यटन क्षेत्राच्या अधोगतीचा चाप लागलेला आहे. शासनाने चुकीच्या पध्दतीने खर्च केल्यामुळे आज आंबोलीत रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.

सर्व पर्यटन पाँईटची दुरवस्था झाली असल्यामुळे आंबोलीत पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. भविष्यात शासनाने आंबोली पर्यटन क्षेत्राकडे पाट फिरवली तर येत्या एक ते दोन वर्षात येथील पर्यटन बंद होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.आंबोली पर्यटन क्षेत्राला यापूर्वी विविध कामांवर लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ते अपूर्ण अवस्थेत आहेत. वाहनतळाची गैरसोय असल्यामुळे पर्यटकांना आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली होती. मात्र त्यांनाही आश्वासनांचे विस्मरण झाले आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग