शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शासनाच्या उदासीनतेमुळे आंबोली पर्यटन विकासाला खिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:26 IST

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या बैठकीत नाराजी ठोस पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशारा

आंबोली : शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आंबोली पर्यटन स्थळाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी विविध विकासकामांवर खर्च करत असलेल्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला आहे.

शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.जिल्ह्यातील प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये शासनाने विकासात्मक धोरणे राबवून आंबोली पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिध्द झाले. तेच पर्यटन क्षेत्र आज भकास होण्याची चिन्हे दिसत आहे.

या पर्यटन क्षेत्राचा विकास न होण्याचे कारण फक्त लोकप्रतिनिधी आणि शासन असल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यटनासाठी आलेला लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही आंबोली पर्यटन स्थळाची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे हा निधी जातो तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आंबोली पर्यटन झपाट्याने वाढ होण्याचे राहिले बाजूला, पण पर्यटन क्षेत्राच्या अधोगतीचा चाप लागलेला आहे. शासनाने चुकीच्या पध्दतीने खर्च केल्यामुळे आज आंबोलीत रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.

सर्व पर्यटन पाँईटची दुरवस्था झाली असल्यामुळे आंबोलीत पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. भविष्यात शासनाने आंबोली पर्यटन क्षेत्राकडे पाट फिरवली तर येत्या एक ते दोन वर्षात येथील पर्यटन बंद होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.आंबोली पर्यटन क्षेत्राला यापूर्वी विविध कामांवर लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही ते अपूर्ण अवस्थेत आहेत. वाहनतळाची गैरसोय असल्यामुळे पर्यटकांना आठ ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली होती. मात्र त्यांनाही आश्वासनांचे विस्मरण झाले आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग