शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अशोक चव्हाणांमुळे मुंबईतील आघाडी संपुष्टात

By admin | Published: January 20, 2017 11:00 PM

सुनील तटकरे : जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू

रत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची शक्यता संपुष्टात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. मुंबईसाठीच्या आघाडीचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच कोकण शिक्षक मतदार संघात निवडणूक लढविणारे पुरोगामी आघाडीचे बाळाराम पाटील यांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ते रत्नागिरीत आले होते.या पत्रकार परिषदेला शेकापचे आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार संजय कदम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मुर्तुझा उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी करण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती. पण अशोक चव्हाण यांच्यामुळे ती तुटली आहे. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादी, कॉँग्रेस व शेकापची आघाडी होणार आहे. काही जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. राज्यभरात या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी यासाठी कॉँग्रेसबरोबर एक बैठक झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील संसदीय बोर्डाची बैठक येत्या २५ जानेवारीला होणार आहे. येत्या चार दिवसांत आघाडीबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे तटकरे म्हणाले. या आघाडीत शेतकरी कामगार पक्षही सहभागी होत असल्याचे तटकरे म्हणाले. यावेळी उपस्थित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला. टिष्ट्वटरवर केवळ टिव टिव...गेली दोन वर्ष ३ महिन्याच्या काळात केंद्रात व राज्यातही सत्ताधाऱ्यांनी टिष्ट्वटरवरून विकासकामांबाबत अनेकवेळा टिष्ट्वट केले. हे आश्वासनांचे बुडबुडे केव्हाच फुटले आहेत. सत्ताधाऱ्यांचे हे टिष्ट्वट म्हणजे केवळ टिव टिव ठरल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली.नोटाबंदीने शेतकरी उद्ध्वस्त...नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्याने हा निर्णय फसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून, विकासदर २ टक्क्यांनी घटला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कामगारांवर बेकारीचे संकट आले आहे. चुकीचे निर्णय हट्टाने राबविल्याचे हे फलित आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.