शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दहा घरांमध्ये पुराचे पाणी

By admin | Updated: July 31, 2014 23:32 IST

पावसाचा दणका : ग्रामस्थांचे स्थलांतर

कुडाळ : तालुक्यात दोन दिवस अहोरात्र सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. कुडाळ तालुक्यातील बऱ्याच पुलांवर पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तसेच आंबेडकरनगर येथील दहा घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतर करावे लागले. तर दुकानवाड येथील पुलाचा काही भाग वाहून गेल्याने सात गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अन्य ठिकाणीही पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.श्रावण महिन्याची सुरुवात पावसाच्या मुसळधार सरींनी झाल्याने दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने उग्र रुप धारण केल्याची स्थिती आहे. यामुळे कुडाळ तालुक्यतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. पावसामुळे कर्ली, भंगसाळ, बेलनदी आदी नद्यांची पात्रे दुथडी भरुन वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून कित्येक ठिकाणी शेती बागायतींमध्ये पाण्याचा प्रवाह घुसला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पीठढवळ नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गाड्यांच्या रांगाच लागलेल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक गुरुवारी सकाळीही विस्कळीतच होती. गुरुवारी सकाळीही महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे गाड्यांना थांबवून ठेवण्यात आले होते. काहीकाळ महामार्ग बंदावस्थेत होता. माणगाव खोऱ्यातील आंब्रड, कुपवडे, तसेच अन्य गावातील रस्तेही पाण्याखाली गेले. त्यामुुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती तर काही ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने सुरु होती. माणगाव खोऱ्यातील दुकानवाड येथील पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामुळे या पुलावरुन वाहतूक करणे जिकिरीचे बनले असून शिवापूरपर्यंतच्या सात गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे.कुडाळ शहरातील वाढत्या बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाह शहरापर्यंत येत असल्याचे निदर्शनास येत आहे. नदीपात्रानजीक बांधकामांसाठी मातीचा भराव टाकण्यात आल्याने पुराचे पाणी शहराच्या काही भागात येत आहे.  पीठढवळ, बेलनदी या महामार्गावरील नद्यांना पाणी आल्याने महामार्गावरही पाणी आले होते. तसेच आंब्रड, कुपवडे पुलावरही पाणी आल्याने अनेक एसटीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. (प्रतिनिधी)