शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

घरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:38 IST

राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देघरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना दहा हजार रुपये देण्याची योजना राबवून त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना देण्यात यावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधुकर जाधव आणि संघाचे पदाधिकारी रावसाहेब पवार, गणेश जाधव, किरण चव्हाण, नीतेश पवार, शिवाजी पवार, अजय जाधव, सागर पवार, बाळकृष्ण जाधव, मनोज जाधव, संतोष पवार आदी उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षीसुद्धा बेलदार भटका समाज अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मानवी मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यातच कोरोना महामारीचे संकट संपूर्ण राज्यावर ओढवले आहे. या महामारीच्या विळख्यात बेलदार भटका समाज सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या मागण्यांबाबत शासनाने तत्काळ दखल घ्यावी, या मागण्यांसाठी बेलदार भटका समाजाच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.विविध मागण्यांचे निवेदन सादरआत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपये देण्याची योजना राबवित त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना द्यावा. जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रत्येक वस्तूचे भाव घोषित केले आहेत तशी आकारणी केली जात आहे का याबाबत खातरजमा करून होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घालावा.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने गोरगरिबांचे रोजगार बुडाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना जोड धंद्याच्या निर्मितीकरिता वसंतराव नाईक महामंडळ, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्याकडून अर्थसहाय्य देऊन या समाजाची विस्कळीत झालेली आर्थिक घडी रुळावर आणावी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण