शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:38 IST

राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देघरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना दहा हजार रुपये देण्याची योजना राबवून त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना देण्यात यावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधुकर जाधव आणि संघाचे पदाधिकारी रावसाहेब पवार, गणेश जाधव, किरण चव्हाण, नीतेश पवार, शिवाजी पवार, अजय जाधव, सागर पवार, बाळकृष्ण जाधव, मनोज जाधव, संतोष पवार आदी उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षीसुद्धा बेलदार भटका समाज अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मानवी मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यातच कोरोना महामारीचे संकट संपूर्ण राज्यावर ओढवले आहे. या महामारीच्या विळख्यात बेलदार भटका समाज सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या मागण्यांबाबत शासनाने तत्काळ दखल घ्यावी, या मागण्यांसाठी बेलदार भटका समाजाच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.विविध मागण्यांचे निवेदन सादरआत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपये देण्याची योजना राबवित त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना द्यावा. जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रत्येक वस्तूचे भाव घोषित केले आहेत तशी आकारणी केली जात आहे का याबाबत खातरजमा करून होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घालावा.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने गोरगरिबांचे रोजगार बुडाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना जोड धंद्याच्या निर्मितीकरिता वसंतराव नाईक महामंडळ, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्याकडून अर्थसहाय्य देऊन या समाजाची विस्कळीत झालेली आर्थिक घडी रुळावर आणावी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण