शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

घरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:38 IST

राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देघरगुती वीजबिल ३०० युनिटपर्यंत माफ करावे, बेलदार भटक्या समाजाची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने मार्च ते जुलै या पाच महिन्यांचे ३०० युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे वीज बिल माफ करावे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना दहा हजार रुपये देण्याची योजना राबवून त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना देण्यात यावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधुकर जाधव आणि संघाचे पदाधिकारी रावसाहेब पवार, गणेश जाधव, किरण चव्हाण, नीतेश पवार, शिवाजी पवार, अजय जाधव, सागर पवार, बाळकृष्ण जाधव, मनोज जाधव, संतोष पवार आदी उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षीसुद्धा बेलदार भटका समाज अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मानवी मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यातच कोरोना महामारीचे संकट संपूर्ण राज्यावर ओढवले आहे. या महामारीच्या विळख्यात बेलदार भटका समाज सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी या मागण्यांबाबत शासनाने तत्काळ दखल घ्यावी, या मागण्यांसाठी बेलदार भटका समाजाच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.विविध मागण्यांचे निवेदन सादरआत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला दहा हजार रुपये देण्याची योजना राबवित त्याचा लाभ भटक्या जाती-जमातीच्या लोकांना द्यावा. जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रत्येक वस्तूचे भाव घोषित केले आहेत तशी आकारणी केली जात आहे का याबाबत खातरजमा करून होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घालावा.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने गोरगरिबांचे रोजगार बुडाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना जोड धंद्याच्या निर्मितीकरिता वसंतराव नाईक महामंडळ, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्याकडून अर्थसहाय्य देऊन या समाजाची विस्कळीत झालेली आर्थिक घडी रुळावर आणावी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण