शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पावसामुळे दोडामार्गातील वीज गायब

By admin | Updated: June 15, 2016 00:06 IST

‘महावितरण’चा कारभार : ग्रामस्थ आंदोलन करणार

साटेली भेडशी : पहिल्या पावसामुळे चिंब झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावे अंधाराच्या साम्राज्यात राहिली. वीज कर्मचाऱ्यांनी लाईनच्या दुरुस्तीकडे व साफसफाईकडे वेळेत पूर्णत: दुर्लक्ष केल्याने १५ दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात अनेक गावांत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. खंडित वीजपुरवठा, कामांबाबतचा पाठपुराव्याचा अभाव आणि कार्यक्षेत्र अंतर्गत गावातील मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुकावासीयांना अंधारात राहावे लागले. यामुळे याचा जाब विचारण्यासाठीच तालुकावासीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला; पण यामुळे मोठा वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा निर्माण झाला. यातच दोडामार्ग वीज कार्यालयातील शाखा अभियंता, कर्मचारी, वायरमन यांचे समन्वय नसल्याने कर्मचाऱ्यांचाही मनमानी कारभार सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील विद्युतवाहिन्यांवर आलेली झाडी, बांबू, झाडी-झुडपे तोडून विद्युतवाहिनी मोकळी करणे व तसे काम संबंधित कर्मचाऱ्यांकडून करून घेणे, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने थोडासाही पाऊस पडला तरी वीजपुरवठा खंडित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शहरासह अनेक गावांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून विजेची गंभीर समस्या असून, दिवस-रात्री सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. फोनही बंद असल्याने वीज कंपनीच्या कारभाराबाबत संतापाची लाट उसळली आहे. विजेवर अवलंबून असलेल्या उद्योग व्यवसाय, नळपाणी योजना यांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यातच वाढीव बिलाच्या माध्यमातून व विविध उपकरांद्वारे सर्वसामान्य वीज ग्राहकांना लुबाडण्याचे काम दोडामार्ग महावितरणकडून सुरू असतानाही सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील विरोधी पक्षांचे नेते मंडळीही या प्रकाराकडे सोईस्कररीत्या डोळेझाक करत असल्याने लोकप्रतिनिधींबाबतही तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)