शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काजू उत्पादनात जिल्हा उपेक्षितच

By admin | Updated: January 2, 2015 00:12 IST

चांगल्या दराची प्रतीक्षाच : कोकणात काजू उत्पादक स्वयंपूर्ण केव्हा होणार ?

खेड : विदर्भ आणि मराठवाड्यातील कापसासारख्या पिकांना शासनाकडून चांगला दर मिळतो़ तसेच सरकार दराचीही हमी देत असते़ याकरिता विविध महामंडळेही निर्माण करण्यात आली आहेत़ मात्र, या तुलनेत चांगले उत्पन्न आणि भरमसाठ परकीय चलन मिळवून देणाऱ्या काजू पिकाला शासन चांगला दर देत नसल्याने जिल्हा उपेक्षित राहिला आहे. याकरिता शासन धोरणात बदल आवश्यक असल्याचे मत अनेक काजू उत्पादकांनी व्यक्त केले आहे. शासनाच्या उदासीनतेमुळेच जिल्ह्यातील स्थानिकांकडे काही प्रमाणात असलेला हा उद्योग हळूहळू परप्रांतीयांच्या हाती जाऊ लागला आहे. मुळातच काजू व्यवसायाबाबत शासनाचे धोरण दिशाहीन आहे. अशातच सरकारमधील वारंवार बदलामुळे या पिकाविषयी मोठी उदासीनता निर्माण होते़ प्रत्येक निवडणुकीत आलेले सरकार आपापल्या पध्दतीने आणि सोयीने कृषीविषयक नवे निर्णय घेत असते. मात्र, हे निर्णय दूरगामी परिणामकारक ठरणारे नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी करणे दुरापास्त होते. बहुपयोगी असलेल्या काजू पिकामध्ये सरकारची उदासीनता ही नेहमीचीच झाली आहे़ या उद्योगातील सरकारचे असलेले लवचिक धोरण स्थानिकांची उदासीनता वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे़ आजही हेच प्रमुख कारण आहे़ अशा परिस्थितीत शासनाकडून येथील शेतकऱ्यांना असहकार्य मिळत आहे. अनेक वेळा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वीच्या तुलनेत काजूचे उत्पादन वाढूनही काजू आणि आंब्यासाठी शासनाने लादलेल्या जाचक अटींमुळे यावर प्रक्रिया करणारे उद्योग मात्र अडचणीत आले आहेत़ राज्य सरकारच्या १०० टक्के फलोद्यान योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना चांगली संधी असूनही तिचा लाभ घेता आला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. खेड तालुक्यात तर शेकडो हेक्टर क्षेत्रात काजूची लागवड करण्यात आली आहे. मात्र, या पिकांचे संरक्षण होत नाही. दरवर्षी या पिकांचे वणव्याने मोठे नुकसान होते. पिकांचे संरक्षण करण्याकामी सरकारनेच आता पावले उचलणे गरजेचे आहे. त्याकरिता स्वतंत्र निधीची आवश्यकता आहे. खेड तालुक्यापुरते बोलायचे झाल्यास यावर्षी लागलेल्या आगीमध्ये काजूच्या अनेक बागा होरपळल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. मात्र, प्रक्रिया उद्योगांची संख्या केवळ २७ टक्के आहे. जिल्ह्यात काजूबीचे ७० टक्के उत्पादन होते़ तर त्यांच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने ही काजूबी केरळ, कर्नाटकमध्ये पाठविली जाते़ परिणामी कच्चा माल तयार होऊनही कोकणात प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने मिळणारे परकीय चलन परप्रांतात जाते़ कोकणात प्रतिवर्षी लाखो मेट्रिक टन काजूबीचे उत्पादन होते. काजूबी वरील प्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेले काजू युनिट कमी पडत आहेत़ येथील उत्पादन लक्षात घेता जिल्ह्यात आणखी १५०० युनिट या उत्पादनासाठी जादा स्थापन करणे गरजेचे आहे़ विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे इकडे सहकाराचे जाळे फारसे विकसित झालेले नाही. यामुळे आंबा व काजू पिकांचे उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना सहकाराच्या तत्त्वावर आधारलेल्या योजनांचा लाभ मिळत नाही, ही वस्थुस्थिती आहे. (प्रतिनिधी)