शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या समस्या

By admin | Updated: August 24, 2014 00:51 IST

आरवली गावाला भेट : समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना

शिरोडा : जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांचा गाव विकासात्मक ‘गावभेट’ कार्यक्रम आरवली येथील पणशीकर मंगल कार्यालयात नुकताच झाला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेत त्याचे निरसन लवकरात लवकर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.प्रास्ताविकात दिलीप पणशीकर यांनी आरवली गावच्या विकासासाठी व प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या समस्यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने हा गावभेट कार्यक्रम आयोजित केल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने डॉ. प्रसाद साळगावकर यांनी आरोग्य विषयक समस्या मांडल्या. तसेच पर्यटनदृष्ट्या नमस शेंड्याच्या तलावाचे सुशोभिकरण करण्याविषयी सूचना केली. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी चांगली राहण्यासाठी याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. बाळा जाधव यांनी हरिजनांच्या दफनभूमीबाबत लक्ष घालून ती ताब्यात घेण्याबाबत आग्रही प्रतिपादन केले. आरवली ग्रामपंचायतीची इमारत २००० साली बांधली व सन २०१० साली निर्लेखित करण्यात आल्याबाबत स्पष्टीकरण मागितले. दादा राय यांनी महसुलबाबत कुळ कायद्यांतर्गत काही प्रश्न विचारले. श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे सचिव जयवंत राय यांनी देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत समाविष्ट करण्याबाबत मागणी केली. आरवली नळपाणी योजनेंतर्गत १ कोटी रुपये खर्चूनही गावातील लोकांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत लक्ष वेधले. बाळू वस्त यांनी कडोबा डोंगर खचून माळीणची पुनरावृत्ती होऊ नये, या दृष्टीने खबरदारी घेण्याची सूचना केली. महेश कनयाळकर, सुदन टाककर, सुधाकर राणे यांनी निवेदने सादर केली. यावेळी सुमारे साडेसात लक्ष रुपये खर्च करून पर्यटन पॅकेजांतर्गत बांधलेल्या पे अँड युज टॉयलेटच्या अज्ञात व्यक्तींनी केलेल्या तोडफोडीची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार जगदीश कातकर, सरपंच श्रध्दा सावळ, सागरतीर्थ उपसरपंच किस्तू सोज, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुनील दळवी, पंचायत समिती उपसभापती सुनील मोरजकर, सदस्य उमा मठकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)