शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाण्याचा टँक बनला डास उत्पत्ती केंद्र

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

सिंधुदुर्गनगरीतील प्रश्न : हिवताप विभागाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील आयटीपार्कमधील पाण्याचा टँक पाण्याने भरण्यात आला आहे. मात्र, त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने हा पाण्याचा टँक डास उत्पत्ती केंद्र बनला आहे.जिल्हा हिवताप विभागामार्फत डास निर्मूलन मोहीम जिल्ह्यात राबविली जात असली तरी जिल्हा मुख्यालय परिसरात असणाऱ्या आयटी पार्कमध्ये असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये गेले दोन महिने पाणी साठवून ठेवल्यामुळे होणाऱ्या डास निर्मितीकडे मात्र हा विभाग डोळेझाक करत आहे. जिल्ह्यात डेंग्यूची साथ फैलावत आहे. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हिवतापाचे रुग्णही वाढत आहेत. विविध तापाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार आजच्या स्थितीला ४१ तापाचे रुग्ण दाखल झाले आहेत.जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नव्यानेच भव्य असे आयटी पार्क उभारण्यात आले आहे. त्यामध्ये पाण्याचा टँक बांधून त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. या टँकमधील पाणी बदलण्यात येत नाही. त्यामुळे या पाण्यात गाळही साठला आहे. अनेक महिने पाणी साठून राहिल्याने या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डास निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याठिकाणी सायंकाळी शासकीय वसाहतीतील कर्मचारी व त्यांची मुले रोज फिरण्यासाठी जातात. अशांना तापाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सिंधुदुर्गनगरी आयटी पार्कमधील पाण्याच्या टँककडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे टँक डास निर्मिती केंद्र बनले आहे. मात्र, या अतिगंभीर समस्येकडे जिल्हा हिवताप विभागाचे लक्ष गेलेले नाही. जिल्ह्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. हे बंधारेही डास उत्पत्तीचे कारण बनणार आहेत. याबाबत हिवताप विभागाचे नियोजन काय? पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बांधण्यात येणारे जिल्ह्यातील बंधारे हिवताप विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे डास निर्मितीला कारण बनणार आहेत. (प्रतिनिधी)