शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

नुकसान मोठे मात्र, भरपाई तुटपुंजी, आॅगस्टमधील अतिवृष्टीत शेती बागायतींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:04 IST

संदेश कोलते सावंतवाडी : यावर्षी सरासरीच्या तुलनेत झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्दे नुकसान मोठे मात्र, भरपाई तुटपुंजी, आॅगस्टमधील अतिवृष्टीत शेती बागायतींची हानीविदर्भ, मराठवाड्याच्या धर्तीवर मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

संदेश कोलतेसावंतवाडी : यावर्षी सरासरीच्या तुलनेत झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सरकारकडून नुकसानभरपाईची जरी घोषणा करण्यात आली असली तरी येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असून विदर्भ व मराठवाड्याच्या धर्तीवर प्रत्येक झाडास वेगळे निकष लावून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओटवणे दशक्रोशीतील शेतकरी करीत आहेत.सावंतवाडी तालुक्यात पुराचा सर्वाधिक फटका ओटवणे व बांदा परिसराला बसला. यात येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे येथील भातशेती, काजू, माड तसेच पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानभरपाईची जरी घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांच्या शेतात न जाता केवळ सातबाराच्या आधारे सरकार भरपाई देणार असल्याचे समजते.ओटवणे, बांदा भागात भातशेतीबरोबर काजू, माड पोफळी, केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भात शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे अल्प असले तरी भात शेतीच्या तुलनेत काजू तसेच माडापासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. तर काजू, माड, पोफळी या शेतीच्या लागवडीसाठी येणारा खर्च मोठा असून या शेतीपासून शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे उत्पन्न मिळते.तसेच् काजू शेतीचा उत्पादन खर्च व नफा भातशेतीच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक शेतीपासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न हे भिन्न असल्यामुळे सरकारने ठरविलेल्या सरसकट नुकसानभरपाईमुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

सरकारने नुकसान भरपाई देताना अधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून माड, पोफळी, केळी, काजू तसेच भातशेती यांना वेगवेगळे निकष लावून नुकसान झालेल्या प्रत्येक झाडांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.सरकार व लोकप्रतिनिधींनी जरी नुकसानभरपाईची घोषणा केली असली तरी मिळणारी भरपाई अल्प आहे. इथे केली जाणारी शेती ही वेगवेगळी असून एखाद्या काजू कलमांच्या पूर्ण वाढ करण्यासाठी पाच वर्षात येणारा खर्च हा दोन ते तीन हजारांच्या घरात आहे. हा खर्च भात शेतीच्या तुलनेत खूपच जास्त असून झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे न करता जर सरकार सरसकट नुकसान भरपाई देत असेल तर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारला द्यायचीच असेल तर प्रत्येक झाडास वेगवेगळे निकष लावून तसे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. भात शेतीच्या निकषावर येथील माड, काजू बागायतदारांना सरकार नुकसान भरपाई देत असेल तर ती सरकारने न दिलेली बरी.संदीप सावंतकाजू, बागायतदार शेतकरीमुसळधार पावसामुळे ओटवणे दशक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर परिस्थितीमुळे येथील केळी बागायतीचे नुकसान झाले आहे. (संदेश कोलते)2 अ३३ंूँेील्ल३२

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग