शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नुकसान मोठे मात्र, भरपाई तुटपुंजी, आॅगस्टमधील अतिवृष्टीत शेती बागायतींची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:04 IST

संदेश कोलते सावंतवाडी : यावर्षी सरासरीच्या तुलनेत झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्दे नुकसान मोठे मात्र, भरपाई तुटपुंजी, आॅगस्टमधील अतिवृष्टीत शेती बागायतींची हानीविदर्भ, मराठवाड्याच्या धर्तीवर मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

संदेश कोलतेसावंतवाडी : यावर्षी सरासरीच्या तुलनेत झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सरकारकडून नुकसानभरपाईची जरी घोषणा करण्यात आली असली तरी येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असून विदर्भ व मराठवाड्याच्या धर्तीवर प्रत्येक झाडास वेगळे निकष लावून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओटवणे दशक्रोशीतील शेतकरी करीत आहेत.सावंतवाडी तालुक्यात पुराचा सर्वाधिक फटका ओटवणे व बांदा परिसराला बसला. यात येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे येथील भातशेती, काजू, माड तसेच पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानभरपाईची जरी घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांच्या शेतात न जाता केवळ सातबाराच्या आधारे सरकार भरपाई देणार असल्याचे समजते.ओटवणे, बांदा भागात भातशेतीबरोबर काजू, माड पोफळी, केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भात शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे अल्प असले तरी भात शेतीच्या तुलनेत काजू तसेच माडापासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. तर काजू, माड, पोफळी या शेतीच्या लागवडीसाठी येणारा खर्च मोठा असून या शेतीपासून शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे उत्पन्न मिळते.तसेच् काजू शेतीचा उत्पादन खर्च व नफा भातशेतीच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक शेतीपासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न हे भिन्न असल्यामुळे सरकारने ठरविलेल्या सरसकट नुकसानभरपाईमुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

सरकारने नुकसान भरपाई देताना अधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून माड, पोफळी, केळी, काजू तसेच भातशेती यांना वेगवेगळे निकष लावून नुकसान झालेल्या प्रत्येक झाडांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.सरकार व लोकप्रतिनिधींनी जरी नुकसानभरपाईची घोषणा केली असली तरी मिळणारी भरपाई अल्प आहे. इथे केली जाणारी शेती ही वेगवेगळी असून एखाद्या काजू कलमांच्या पूर्ण वाढ करण्यासाठी पाच वर्षात येणारा खर्च हा दोन ते तीन हजारांच्या घरात आहे. हा खर्च भात शेतीच्या तुलनेत खूपच जास्त असून झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे न करता जर सरकार सरसकट नुकसान भरपाई देत असेल तर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारला द्यायचीच असेल तर प्रत्येक झाडास वेगवेगळे निकष लावून तसे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. भात शेतीच्या निकषावर येथील माड, काजू बागायतदारांना सरकार नुकसान भरपाई देत असेल तर ती सरकारने न दिलेली बरी.संदीप सावंतकाजू, बागायतदार शेतकरीमुसळधार पावसामुळे ओटवणे दशक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर परिस्थितीमुळे येथील केळी बागायतीचे नुकसान झाले आहे. (संदेश कोलते)2 अ३३ंूँेील्ल३२

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग