शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

सिंधुदुर्गसाठी नुकसान भरपाईबाबत वेगळे निकष : दीपक केसरकर

By admin | Updated: May 13, 2017 11:56 IST

पंचनामे दोन दिवसात : नरेगा अंतर्गत तीन ते चार वर्षांची झाडे देणार

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १३ : बांदा ता. सावंतवाडी परिसरात जे चक्रीवादळ झाले त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी फलोद्यान जिल्हा म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेगळे निकष लावण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. ज्या गावात पूर्ण अथवा अंशत: नुकसान झाले आहे तेथील पंचनामे दोन दिवसात करुन नरेगा अंतर्गत तीन ते चार वर्षांची झाडे देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्?ती व्यवस्थापन, वीज पुरवठा व पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रशेखर पाटील, कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री वेलुकर उपस्थित होते.बांदा परिसरात चक्रीवादळ झाल्यामुळे ज्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या गावात केंद्र शासनाच्या नरेगा योजनेअंतर्गत फळ झाड तसेच खड्डा खणणे आदिसाठी मदत केली जाणार आहे. यासाठीचे पंचनामे दोन दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधीत विभागाकडून या वादळात फळझाडांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.देवगड तालुक्यात कातळ जमिनीमुळे सर्वाधिक पाणी टंचाईचा फटका बसतो. म्हणून या भागामध्ये टंचाई भासणार नाही, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला जाईल. यासाठीच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मोंड येथील विहिरीचे सर्वेक्षण,आंबोली सतीची वाडी पाण्याची व्यवस्था, सजेर्कोट येथे आरओ प्लांट बसविण्यासाठी पाहणी करणे याबाबतही त्यांनी यावेळी सूचना दिल्या.पाणी पुरवठ्याच्या किती योजना पूर्ण झाल्या आहेत, किती अपूर्ण आहेत, ठेकेदारांच्या काय अडचणी आहेत, याचा आढावा दर आठवड्याला घेऊन टंचाई अंतर्गत ज्या ठेकेदारांनी कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. विधन विहिरीसाठी जेवढी जागा लागेल तेवढ्याच जमिनीचे बक्षीसपत्र करून घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अशा विहिरींची कामे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.आपत्?ती व्यवस्थापनामध्ये ग्रामपातळीवर अंमलबजावणी होते की नाही, शेवटच्या स्तरापर्यंत कर्मचारी सहभागी होतो की नाही याचे सर्वेक्षण करण्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी, वाफोली, बांदा व विलवडे येथे चक्रीवादळामुळे विजेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसात द्यावा व वीज जोडणीची आवश्यक ती कामे तातडीने करून विद्युत पुरवठा पूर्ववत करावा असेही त्यांनी सांगितले. पावसाळयापूर्वी विजेच्या संदभार्तील सर्व कामे पूर्ण करावीत तसेच वीज गेल्यास ती पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ज्या गावात वीज गेल्यावर तीन ते चार दिवस येत नाही अशा ठिकाणी विशेष लक्ष्य देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. व ही सर्व कामे १५ जून पूर्वी पूर्ण करावीत यासाठी कामगारांची आवश्यकता भासल्यास तात्पुरत्या कालावधीसाठी कामगार नेमावेत असे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले.